Headlines

वडिलांच्या एका अटीमुळे Amitabh Bachchan यांना करावं लागलं लग्न आणि रेखाऐवजी जया झाली अर्धांगिनी

[ad_1]

Amitabh Bachchan Jaya Bachchan Wedding : महानायक अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्याकडे बॉलीवूडमधील यशस्वी  कपल म्हणून पाहिलं जात. त्या दोघांनीही एक ना अनेक चित्रपटांत एकत्र काम केलं आहे.

त्यांची प्रेम कहाणी मात्र अतिशय रंजक आहे. फार कमी लोकांना अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या प्रेमकहाणीबद्दल माहित आहे. एका मुलाखतीदरम्यान खुद्द बिग बींनीच त्यांच्या या Love Story वरून पडदा उचलला होता.

मुलाखतीत अमिताभ बच्चन (Amitabh bchchan) यांनी सांगितलं होतं, Magzine च्या कव्हर पेजवर जया बच्चन(Jaya Bachchan) यांना पाहून ते त्यांच्या प्रेमातच पडले होते आणि इथूनच त्यांच्या प्रेमाची सुरवात झाली. तोपर्यंत हे प्रेम एकतर्फी होतं.

पुढे जाऊन ऋषीकेश मुखर्जी यांच्या ‘गुड्डी’ (Guddi) सिनेमात दोघांनी एकत्र काम केलं आणि तिथे त्यांची प्रेमकहाणी फुलू लागली , त्यावेळी अमिताभ बच्चन यांच्या करिअरमधील सुरुवातीचे अर्थात संघर्षाचे दिवस होते, तर जया बच्चन(jaya bhadhuri) मात्र यशस्वी अभिनेत्री म्हणून

नावारुपास आल्या होत्या. दोघेही एकमेकांना पसंत करू लागले होते. मात्र कधीही एकमेकांना त्यांनी हे बोलून दाखवलं नव्हतं. पुढे जाऊन ‘जंजीर’ सिनेमा सुपरहिट झाला त्यामुळे प्रकाश मेहरा सर्व कलाकारांना घेऊन परदेश दौऱ्यावर जाणार होते पण, लग्न केल्याशिवाय परदेशी

जायचं नाही अशी  अट त्यावेळी अमिताभ बच्चन यांचे वडील हरिवंशराय बच्चन यांनी घातली. 

यामुळे अमिताभ बच्चन व जया बच्चन यांना लग्न करावं लागलं. दोन्ही कलाकारांनी एका मंदिरात जाऊन गुपचूप लग्न केलं आणि या लग्नानंतर ते परदेशी गेले.

खर तर रेखा आणि अमिताभ बच्चन(Rekha and Amitabh bachhan love story ) यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडत होती दोघे एकमेकांसोबत लग्न करतील किंवा त्यांच्या अफेयरच्या चर्चा त्या काळात खूप जोर धरत होत्या अशातच अमिताभ आणि जया यांच्या लग्नाच्या

बातमीने सर्वाना आश्चर्याचा पण सुखद धक्काच दिला होता . 

 

 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *