बार्शी / प्रतिनिधी – कोविडच्या संभाव्य येणाऱ्या लाटेमुळे होणारी हानी टाळण्यासाठी योग्य सूचना करण्याकरीता शासनाने टास्कफोर्स समितीचे गठन केले आहे .या समितीमध्ये बऱ्याच डॉक्टर सदस्यांचे समावेश केलेले आहे परंतु एकाही सूक्ष्मजीवशास्त्रज्ञा चा समावेश नाही ही खेदाची बाब असल्याचे मत बार्शी येथील सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ सुहास कुलकर्णी यांनी व्यक्त केले आहे
वास्तविक पाहता कोविड हा विषाणूजन्य रोग असून या विषाणूंची अत्यन्त सखोल माहिती ही सूक्ष्मजीवशास्त्र शिकलेल्यानाच असते आणि त्यामुळेच टेस्टिंग लॅब, फार्मा कंपन्या, लस निर्मिती करणाऱ्या कंपन्या, जिनोम सिक्वेन्सीग,कोविड रिसर्च सेंटर्स या ठिकाणी ९५ % योगदान हे सूक्ष्मजीवशास्त्रज्ञाचे असते.
- प्रेम आणि नात्याचा अनुबंध उलगडणारा ‘लेक असावी तर अशी’, ट्रेलर तुम्ही पाहिलात का?
- 32 वर्षांपासून बेपत्ता आहे ‘हा’ अभिनेता; कोण म्हणालं वेड्यांच्या इस्पितळात कोण, म्हणालं रस्त्यांवर दिसला, सत्य काय?
- ‘कभी खुशी कभी गम’मधील शाहरुख- काजोलचा ऑनस्क्रीन मुलगा आता कायच्या काय हॅण्डसम दिसू लागलाय, Photo पाहिले?
- ‘Chamkila’ चित्रपट आणि अमिताभ बच्चन यांचं काय आहे कनेक्शन?
- 2 महिन्यानंतर कोमातून बाहेर आली 25 वर्षीय Adult Star; ‘त्या’ रुममध्ये फेब्रुवारीत काय घडलं? गूढ कायम
कोविड च्या येऊन गेलेल्या दोन्ही लाटेमध्ये सूक्ष्मजीव शास्त्र शिकलेल्या बऱ्याच जणांनी भरीव कामगिरी केलेली आहे .शासनाच्या टास्कफोर्स मध्ये एकातरी सूक्ष्मजीवशास्त्रज्ञाचा समावेश असणे आवश्यक आहे जेणे करून कोरोना विषाणू चे म्युटेशन,व्हेरिएंट,लसींची परिणामिकता , लसींची आवश्यकता,विषाणू प्रसार व नियंत्रण या संदर्भात योग्य विज्ञान आधारित दिशा देऊन संभाव्य पुढील लाटेपासून होणारी हानी टाळण्यासाठी योग्य मार्गदर्शन सूचना करता येतील असे स्पष्ट मत सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ सुहास कुलकर्णी यांनी व्यक्त केले आहे.