Headlines

‘ठाकरे सरकारला दोष देत नाही, पण…’ देवेंद्र फडणवीस म्हणाले… | devendra fadnavis said will not blame to uddhav thackeray and maha vikas aghadi government anymore

[ad_1]

शिवसेना पक्षातील अभूतपूर्व अशा बंडखोरीनंतर राज्यात सत्तांतर झाले. तब्बल ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला. सध्या राज्यात सत्तापालट झाले असून मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस सत्ताशकट हाकत आहेत. याआधी विरोधी पक्षात असलेले देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला सातत्याने लक्ष्य केले आहे. उद्धव ठाकरे नेतृत्व करत असलेल्या महाविकास आघाडी सरकारने भाजपा-शिवसेना युती सरकारच्या योजना बंद केल्याचाही आरोप फडणवीस यांनी यापूर्वी अनेकवेळा केला आहे. मात्र आता सत्तेत आल्यानंतर ठाकरे सरकारला दोष देणार नाही. राज्याच्या विकासासाठीचे प्रकल्प जलदगतीने पूर्ण करण्याचा प्रण केला आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

हेही वाचा >>> Weather Forecast : पुढील ४ ते ५ दिवस महत्त्वाचे! राज्यात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता, जाणून घ्या हवामान खात्याचा ताजा अंदाज

“हे प्रकल्प का रखडले गेले हे तुम्हाला माहिती आहे. पण आता मला जुन्या सरकारला दोष द्यायचा नाही. मी आणि एकनाथ शिंदे यांनी हे सर्व प्रकल्प जलदगतीने पूर्ण करायचे, असा प्रण केला आहे,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंत्रालयातील आपल्या दालनातून आजपासून कामास सुरुवात केली. त्यांनी आज राज्यात सध्या सुरु असलेल्या तसेच इतर प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित होते. बैठकीत कोल्हापूर तसेच सांगली जिल्ह्यातील महापूर तसेच अतिवृष्टीचे पाणी मराठवाड्याकडे वळवणे, वळणगंगा पेणगंगा नदीजोड प्रकल्प आणि स्मार्ट प्रोजेक्ट (बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प ) योजनेवर चर्चा करण्यात आली. या योजनेसाठी जागतिक बँकेने एकूण तीन हजार कोटी रुपये दिले होते. मात्र मागील अडीच वर्षात फक्त १३ कोटी रुपयेच खर्च होऊ शकले, असे फडणवीस यांनी सांगितले. त्यानंतर पत्रकारांनी यामागचे कारण विचारताच फडणवीस यांनी वरील भाष्य केले.

हेही वाचा >>> उद्धव ठाकरेंना आणखी मोठा धक्का, ठाण्यानंतर नवी मुंबईतील नगरसेवक शिंदे गटात सामील होणार?

“२०१९ साली स्मार्ट प्रोजेक्ट (बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प ) मंजूर केला होता. त्यानुसार महाराष्ट्रात दहा हजार अॅग्री बिझनेस सोसायट्या तयार करुन १९ लाख शेतकऱ्यांना मदत करण्याचे नियोजन होते. या प्रकल्पाला जागतिक बँकेने ३ हजार कोटी रुपये दिले होते. दुर्दैवाने मागील अडीच वर्षात या प्रकल्पात आपण केवळ १५ कोटी रुपये खर्च करु शकलो. या प्रकल्पाला फास्ट ट्रॅकवर आणण्यासाठी आज बैठक झाली. या प्रकल्पासंदर्भात एक वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. शेतकरी, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि पिकांची व्हॅल्यू चैन तयार करण्यासाठी या प्रकल्पाच्या माध्यमातून फार फायदा होणार आहे,” अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

हेही वाचा >>> शिवसेना म्हणजे भरकटलेलं जहाज, बेताल वक्तव्ये करणारे प्रवक्तेच शिल्लक राहणार- राधाकृष्ण विखे पाटील

तसेच पुढे त्यांनी मराठवाडा आणि राज्यातील इतर भागातील पाणीटंचाईवरही भाष्य केले. “मागील काळात सांगली आणि कोल्हापूरला पूर आला होता. दरवर्षी असाच पूर आला, तर काय करायचे यावर आपण अभ्यास केला होता. जागतिक बँकेच्या मदतीने आपण एक अप्रुव्हल घेतलं होतं. यामध्ये वळण बंधारे आणि टनेल सिस्टीमच्या माध्यमातून पाणी मराठवाड्याकडे वळवता येईल का? यावर अभ्यास करण्यात आला,” अशी माहिती दिली.

हेही वाचा >>> डोंबिवलीतील वाहनांमधून बंडखोर आमदार सुरतेत, गुजरातच्या हद्दीत पोहोचताच…; BJP कनेक्शनची गोष्ट

तसेच, “सांगली आणी सोलापूर भागातील जे पुराचं पाणी आहे; ते महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्या हिश्श्याव्यतिरिक्त आहे. तेव्हा आपण त्यावर अभ्यास केला होता. आज पुन्हा एकदा जागतिक बँकेसोबत आपण बैठक घेतली. त्यांची या प्रकल्पाला मदत करण्याची पूर्ण तयारी आहे. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भातही निर्देश दिले आहेत. त्यामुळे याचा डीपीआर तयार करुन जागतिक बँकेकडे देण्यात यावा, असे निदेर्शही देण्यात आले आहेत,” असे फडणवीस यांनी सांगितले.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *