[ad_1]
वाचा: तुमच्या लॅपटॉपची बॅटरी लवकर संपते? या सोप्या टिप्स येतील खूपच उपयोगी
सोशल मीडियामध्ये फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम आणि इतर प्लॅटफॉर्म्सचा समावेश आहे. भारतात कोट्यावधी यूजर्स या प्लॅटफॉर्म्सचा वापर करतात. गेल्याकाही दिवसात अशा अनेक घटना समोर आल्या आहेत, ज्यात सोशल मीडिया पोस्टमुळे यूजर्सवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे या प्लॅटफॉर्म्सवर कंटेंट पोस्ट करताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. भारतात सोशल मीडिया पोस्टबाबत कठोर कायदे आहेत. आक्षेपार्ह पोस्ट केल्यास जेल देखील होऊ शकते.
वाचा: संपूर्ण ३० दिवसांच्या वैधतेसह येतात Jio ‘हे’ रिचार्ज प्लान्स, फ्री कॉलिंगसह मिळेल भरपूर डेटा
अशा पोस्ट शेअर करणे टाळा
सोशल मीडियावर हिंसक, द्वेष पसरवणाऱ्या पोस्ट शेअर करू नये. याशिवाय, धार्मिक भावना दुखावल्या जातील, अशा पोस्ट देखील शेअर करणे टाळावे. कधीही दोन धर्मांमध्ये द्वेष निर्माण होईल, अशी पोस्ट शेअर करू नये. सोशल मीडियावर पोस्ट करताना भाषेची मर्यादा बाळगणे गरजेचे आहे. कोणत्याही व्यक्तीसाठी आक्षेपार्ह भाषेचा वापर करू नये. तसेच, देशाच्या एकता व अखंडतेला नुकसान पोहचेल अशा पोस्ट शेअर केल्यावर देखील कारवाई केली जाते. अशा पोस्ट शेअर करण्यासाठी दोषी आढळल्यास दंडासोबतच जेलची हवा खायला लागू शकते.
वाचा: ५जी स्पेक्ट्रमच्या लिलावाची प्रक्रिया पूर्ण, जिओने मारली बाजी; तब्बल ‘एवढ्या’ कोटींची लागली बोली
[ad_2]