Headlines

Aishwarya Rai सोबत रेडकार्पेटवर गेल्यामुळे Abhishek Bachchan ला ऐकावे लागले होते टोमणे, ट्रोलर्सला असं दिलं प्रत्युत्तर

[ad_1]

Abhishek Bachchan and Aishwarya Rai : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai Bachchan) आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांची जोडी ही पॉवर कपल म्हणून ओळखली जाते. ऐश्वर्या आणि अभिषेक हे दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. ऐश्वर्या आणि अभिषेक हे 2007 साली लग्न बंधनात अडकले होते.  ऐश्वर्याला मिळालेल्या यशासमोर अभिषेकची नेहमीच तुलना केली जाते. याच कारणामुळे बऱ्याचवेळा अभिषेक ट्रोलिंगचा शिकार झाला आहे. एकदा तर ऐश्वर्यासोबत सगळीकडे फिरतो म्हणून अभिषेकला अनेकांनी टोमणे मारले होते. याविषयी स्वत: अभिषेकनं खुलासा केला होता. 

रिपोर्ट्सनुसार, अभिषेकनं 2012 साली फिल्मफेअरला एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत अभिषेकनं 2007 साली कान्स फेस्टिव्हलचा एक किस्सा सांगितला आहे. या मुलाखतीत अभिषेकला प्रश्न विचारण्यात आला होती की त्यानं पत्नी ऐश्वर्यावर कधी कोणत्या गोष्टीसाठी निर्बंध घातला होत्या का? त्यावर उत्तर देत म्हणाला की असं तोच व्यक्ती करू शकतो, जो असुरक्षित आहे किंवा ज्याचा पत्नीवर विश्वास नाही. जर कोणी त्याची गर्लफ्रेंड, आई किंवा कोणत्या स्त्रीला कोणत्या गोष्टीसाठी अडवत असेल तर त्याचा त्यांच्यावर विश्वास नाही. मला असे संस्कार मिळाले नाही. माझी आई अभिनेत्री होती आणि अजूनही ती अभिनय करते.  

यानंतर अभिषेक कान्स फेस्टिव्हलमधील एक किस्सा सांगितला. खरंतर, 2007 सालीच लग्नाच्या काही महिन्यांनंतर ऐश्वर्या कान्स फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली होती. यावेळी ऐश्वर्यासोबत अभिषेक देखील तिथे पोहोचला होता. यादरम्यान, ऐश्वर्यासोबत रेड कार्पेटवर वॉक केल्यामुळे अभिषेकला टोमने ऐकावे लागले होते. ‘कान्समध्ये पत्नीसोबत रेड कार्पेटवर वॉक करताना कसे वाटले?’ असे प्रश्न त्याला विचारण्यात आले. नतद्रष्ट मानसिकतेतून अशा गोष्टी घडतात, असं अभिषेक म्हणाला. 

हेही वाचा : ‘Katrina Kaif साठी मी Perfect पती नाही…’, Vicky Kaushal नं का केलं असं वक्तव्य?

यावेळी उत्तर देत अभिषेकनं प्रश्न केला की, जर ऐश्वर्या त्याच्या सगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावू शकते, तर तो त्याच्या पत्नीला पाठिंबा देण्यासाठी तिच्यासोबत जाऊ शकत नाही का? पुढे ज्या लोकांना असं करणं चुकीचं वाटतं अशा लोकांना अभिषेक ओरडला आणि म्हणाला, जेव्हा ऐश्वर्या माझ्या चित्रपटांच्या प्रीमियरसाठी माझ्यासोबत रेड कार्पेटवर वॉक करू शकते तर मी तिच्यासोबत का जाऊ शकत नाही. तिच्या प्रत्येक पावलावर तिची साथ देणं हे माझं काम आहे. 

दरम्यान, 2005 साली सगळ्यात आधी ऐश्वर्यानं पहिल्यांदा कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली होती. तेव्हापासून ऐश्वर्या दरवर्षी कान्स फिल्म फेस्टिव्हलला हजेरी लावते. तर ऐश्वर्या ही पहिली भारतीय आहे जिनं कान्स फिल्म फेस्टिव्हलला हजेरी लावली होती. तिच्यासोबत कधी-कधी अभिषेक दिसायचा. मात्र, आता ऐश्वर्यासोबत तिची लेक आराध्या दिसते. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *