[ad_1]
Maharashtra Political Crisis Updates: राज्यात सत्तांतर झाल्यानंतरच्या पहिल्याच पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदारांना जशास तसं उत्तर देण्याचे आदेश दिल्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भाजपाने संसदीय मंडळ आणि निवडणूक समितीतून वगळलं असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. याउलट निवडणूक समितीत देवेंद्र फडणवीसांना स्थान देत पक्षाने त्यांना महत्त्व दिल्याचं बोललं जात आहे. तसंच मोहित कंबोज यांनी सिंचना घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मोठा नेता जेलमध्ये जाणार असल्याचा दावा केल्यामुळेही राजकारण तापलं आहे.
Maharashtra Breaking News Live Updates : महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर!
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपवण्यात आले. सरकारमध्ये सहभागी होणार नाही, असे त्यावेळी जाहीर करणाऱ्या फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याचा जाहीर आदेश पक्षाध्यक्ष जे पी नड्डा यांनी दिला होता. पण, पक्षाच्या निवडणूक समितीत फडणवीस यांना स्थान देऊन पक्षाने त्यांचे महत्त्व अधोरेखित केलं असल्याचं मानलं जात आहे. तसंच भविष्यात फडणवीस हे राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाची भूमिका निभावू शकतात, हा संदेश पक्षाने दिला आहे.
[ad_2]