Headlines

मोठी बातमी! राजीव गांधी हत्याकांडातील आरोपीला जामीन, 31 वर्षाने तुरुंगाबाहेर

[ad_1]

तामिळनाडू : राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांच्या हत्येतील आरोपी पेरारिवलनची (Perarivalan) जामिनावर (Bail) सुटका करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court हे आदेश दिले आहेत. पेरारिवलन 30 वर्षांहून अधिक काळ तुरुंगात आहे, या काळात त्याची वागणूक चांगली आहे, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.  

पेरारिवलनच्या सुटकेचा निर्णय घेण्यास सरकारकडून होत असलेल्या विलंबामुळे त्याला कायमचं तुरुंगात ठेवता येणार नाही असंही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. 

पेरारिवलनने न्यायालयाला सांगितलं की, तामिळनाडू सरकारच्या सुटकेच्या आदेशाला राज्यपाल आणि केंद्र सराकरकडून मिळत नाहीए.  शिक्षा माफ करण्याचा त्यांचा अर्जही निर्णयाविना अडकला आहे. न्यायमूर्ती एल नागेश्वर राव आणि बीआर गवई यांनी आदेशात हे युक्तिवाद नोंदवले आहेत.

सुनावणीदरम्यान केंद्र सरकारतर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल केएम नटराज यांनी पेरारिवलनच्या सुटकेला कडाडून विरोध केला. ते म्हणाले की, 1999 मध्ये आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. 2014 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्याचं जन्मठेपेत रूपांतर केलं. राष्ट्रपतींना त्याच्या दयेच्या याचिकेवर निर्णय घेण्यासाठी वेळ लागत असल्याचं कारण यामागे देण्यात आलं होतं.

पेरारिवलनची शिक्षा कायद्याने माफ करण्याचा निर्णय केंद्राने घ्यायचा आहे, असं अतिरिक्त सॉलिसिटर जनरल यांनी म्हटलं. न्यायमूर्तींनी या युक्तिवादांची दखल घेतली, पण त्यासाठी आरोपीला आणखी न्यायालयात ठेवता येणार नसल्याचं सांगत जामीन मंजूर करण्यात आला. 

राजीव गांधी यांची हत्या
21 मे 1991 रोजी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची तामिळनाडूमधील श्रीपेरुंबदूर येथे हत्या करण्यात आली. याप्रकरणई पेरारिवलनला 11 जून 1991 रोजी अटक करण्यात आली होती. बॉम्बस्फोटात वापरण्यात आलेली 8 व्होल्ट बॅटरी विकत घेऊन हल्ल्याचा मास्टरमाईंड शिवरासन याला दिल्याप्रकरणी पेरारिवलनवर आरोप सिद्ध झाला होता. घटनेच्या वेळी 19 वर्षांचा असलेला पेरारिवलन याने तुरुंगात राहून अभ्यास सुरू ठेवला. त्याने चांगले गुण मिळवून अनेक पदव्या मिळवल्या. त्याला जामीन मंजूर करताना न्यायालयाने या बाबींनाही विचारात घेतलं. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *