Headlines

घर-संसार सांभाळ्यासाठी या अभिनेत्रींनी लग्नानंतर अभिनय क्षेत्राला ठोकला रामराम…

[ad_1]

Actresses Who Quit Acting after Marriage: लग्न झाल्यानंतर आणि मुल जन्मला आल्यानंतर स्त्रियांच्या जबाबदारीत वाढ होते. आजकाल अनेक स्त्रिया आपलं करिअर सांभाळत घरही सांभाळताना दिसतात आणि यशस्वीपणे सांभाळताना दिसतात. परंतु बॉलीवूडमध्ये मात्र अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी लग्नानंतर करिअर सोडून घराकडे लक्ष दिले. (bollywood actresses who quit acting after marriage and who prefer becoming housewife)

एकेकाळी बॉलीवूड गाजवलेल्या याच अभिनेत्रींबद्दल आम्ही सांगणार आहोत. ज्यांनी बॉलीवूडमध्ये आपलं चांगलं सुरू असलेलं करिअर सोडून घराकडे लक्ष देण्याचा निर्णय घेतला आणि सिनेसृष्टीपासूनही बराच काळ लांब राहिल्या. 

आणखी वाचा – करीना, विद्या बालनसोबत जुळलं नाव, पण अभिनेत्याने अरेंज मॅरेज करत सगळ्यांनाच दिला धक्का

सोनाली बेंद्रे – सोनाली बेंद्रे ही 1994 साली अभिनय क्षेत्रात आली. पण 2002 मध्ये गोल्डी बहलसोबत लग्न केल्यानंतर सोनालीचे लक्ष घराकडेच जास्त लागले त्यामुळे 2003 नंतर तिने हिंदी फिल्म इंडस्ट्रीतून दीर्घकाळ ब्रेक घेतला. 2004 मध्ये तिचा मराठी आणि तेलुगु चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्यानंतर ती 9 वर्षे रूपेरी पडद्यापासून दूर राहिली. 2013 मध्ये तिनं एका चित्रपटात कॅमिओ रोल केला होता. त्यानंतर ती आता छोट्या पडद्यावर परतली आहे 2021 पासून ती ओटीटीवर वेगवेगळ्या वेबसिरिज करते आहे. 

जेनेलिया डिसूजा – 2012 मध्ये रितेश देशमुखसोबत लग्न केल्यानंतर जेनेलियानं आपल्या कुटुंबावर अधिक लक्ष केंद्रित केले. ती कॅमेऱ्यांवर दिसली तरी ती छोट्या आणि साईड रोलमधून प्रेक्षकांसमोर आली. ती आत्तापर्यंत बऱ्याच चित्रपटातून कॅमिओ रोलमध्ये दिसली पण आता लग्नाच्या 10 वर्षानंतर ती मुख्य भूमिकेतून रुपेरी पडद्यावर परतणार आहे. तिचा मराठी चित्रपट वेद आणि हिंदी चित्रपट मिस्टर ममी लवकरच प्रदर्शित होणार आहेत.

असिन – साऊथ चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर असिन बॉलिवूडमधल्या जवळपास प्रत्येक मोठ्या स्टारसोबत मोठ्या स्क्रिनवर दिसली परंतु तिने लग्न होताच अभिनयाला अलविदा केला आणि आजपर्यंत ती कॅमेऱ्यांपासून दूर राहिली आहे. असिन गजनी, रेडी यांसारख्या चित्रपटात दिसली होती पण 2016 मध्ये राहुल शर्मासोबत लग्न झाल्यापासून ती घरात अधिक लक्ष घालते आहे. 

आणखी वाचा – आई नीतू कपूरनं Ranbir चा फोटो शेअर करतानाच नेटकरी म्हणाले…

नम्रता शिरोडकर – बॉलीवूड गाजवल्यानंतर नम्रता शिरोडकरनं साऊथ इंडियन इंडस्ट्रीत पदार्पण केले यानंतर तिनं साऊथ सुपरस्टार महेश बाबू सोबत लग्न केले होते. त्यांना एक मुलगाही आहे. आता नम्रता पुर्णपणे आपल्या कामावर लक्ष केंद्रित करत आहे. 

ट्विंकल खन्ना –  ट्विंकल खन्ना बॉलिवूडमध्ये बरेच सिनेमे केले पण अक्षयसोबत लग्न झाल्यानंतर अभिनय सोडण्याचा निर्णय तिनं घेतला. तिचा मेला चित्रपट प्रदर्शित झाला होता जेव्हा ती अक्षय कुमारला डेट करत होती. सध्या ट्विंकल आपल्या लिखणात व्यस्त आहे आणि घरसंसार लक्ष घालते आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *