Headlines

आलिया भट्टशी लग्न केल्यानंतर रणबीर कपूरमध्ये मोठा बदल, नीतू कपूर यांचं मोठं वक्तव्य

[ad_1]

मुंबई : रणबीर कपूर आणि आलिया भट्ट या वर्षी एप्रिलमध्ये विवाहबद्ध झाले. दोघंही जवळपास 5 वर्षे एकमेकांना डेट करत होते आणि शेवटी 14 एप्रिल 2022 रोजी त्यांनी त्यांच्या कुटुंबीय आणि मित्रांच्या उपस्थितीत सात फेरे घेतले. लग्न झाल्यापासून हे कपल चर्चेत आहे. आता नीतू कपूरने एक वक्तव्य करत सांगितलं आहे  की, आलियाच्या घरी आल्यानंतर तिच्या मुलामध्ये काय बदल झाले आहेत.

मुलगा रणबीर कपूर आणि सून आलिया भट्ट यांच्याप्रमाणेच नीतू कपूरही सध्या तिच्या कामात खूप व्यस्त आहे. अनेकदा तिची झलक सोशल मीडियावर पाहायला मिळते. आता नुकतीच तिने एक मुलाखत दिली ज्यामध्ये तिने आपल्या मुलामध्ये झालेल्या बदलांबद्दल सांगितलं आहे. यादरम्यान तिने आपल्या अनेक गुपितं उघडली आणि रणबीरच्या लग्नानंतर सर्वांचं आयुष्य कसं बदललं हे देखील सांगितलं आहे.

विशेषत: लग्नानंतर रणबीरने स्वत:मध्ये खूप बदल केला आहे. नीतू कपूर म्हणाली, ‘मी आज सर्वात जास्त आनंदी आहे. आलियाने रणबीरला खूप प्रेम आणि आपुलकी दिली आहे. त्याच्यात मला बदल जाणवतो. ते दोघं एकत्र छान दिसतात. मी खूप आनंदी आहे आणि भाग्यवान आहे की, आलिया आमच्या कुटुंबात आली आहे. आयुष्य खरोखरच खूप बदललं आहे आणि मी खूप समाधानी आहे. ते टेन्शन राहिलं नाही, लग्न केलं नाही, लग्न केलं नाही, आता लग्न झालं.

रणबीर-आलियाचा ट्रेंड सुरू झाला
रणबीर आलियाबद्दल बोलताना नीतू पुढे म्हणाली, ‘त्यांनी अनेक लोकांसाठी ट्रेंड सेट केला आहे. तुम्हाला मोठं लग्न करण्याची गरज नाही. तुमचा असा विवाह असावा ज्यामध्ये तुम्ही आनंदी असाल. अन्यथा, आपण इतरांना आनंदी करू लागतो. आम्ही तुम्हाला सांगतो की, या कपलच्या लग्नात फक्त 40 लोकं पाहुणे म्हणून उपस्थित होते, ज्यामध्ये तिचे कुटुंबीय, खास मित्र आणि नातेवाईक होते.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *