Headlines

ऐश्वर्या- Salman Khan मध्ये आजही…; बॉलिवूड दिग्दर्शकामुळं मोठा खुलासा

[ad_1]

Sanjay Leela Bhansali Over Salman And Aishwarya Not Working Together : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ऐश्वर्या ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. आता ऐश्वर्या तिच्या वैवाहिक जीवनात आनंदी आहे. मात्र, ती बऱ्याचवेळा तिच्या आणि बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या (Salman Khan) रिलेशनशिपमुळे चर्चेत येते. या दोघांची लव्ह स्टोरी ही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. (Salman Khan And Aishwarya Rai Bachchan Relationship) ऐश्वर्या आणि सलमाननं बॉलिवूडचे लोकप्रिय दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांच्या ‘हम दिल दे चुके सनम’ (Ham Dil De Chuke Sanam) आणि ‘देवदास’ (Devdas) चित्रपटांमध्ये काम केले होते. या दोघांमध्ये या दरम्यान चांगली मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. यानंतर त्यांच्यात भांडण होऊ लागली आणि त्यामुळे संजय लीला भन्साळी यांना किती अडचणींचा सामना करावा लागला याविषयी संजय लीला भन्साळी यांनी ‘कॉफी विथ करण’ मध्ये खुलासा केला होता.

संजय लीला भन्साळी यांनी 2004 मध्ये ‘कॉफी विथ करण’ (Koffee With Karan) मध्ये हजेरी लावली होती. यावेळी संजय लीला भन्साळी सलमान आणि ऐश्वर्या यांच्या भांडणाविषयी सांगत म्हणाले की जेव्हा ते विभक्त झाले तेव्हा त्या दोघांनी एकमेकांसोबत काम न करण्याती शपथ घेतली आणि त्याचामुळे दिग्दर्शकांच्या अडचणी कशा प्रकारे वाढल्या. खरंतर संजय लीला भन्साळी यांना ऐश्वर्या आणि सलमानला ‘बाजीराव मस्तानी’ (Bajirao Mastani) या चित्रपटांमध्ये कास्ट करायचं होतं. पण ते होऊ शकलं नाही.

मस्तानीची भूमिका साकारण्यावर काय म्हणाली ऐश्वर्या

एका मुलाखतीत ऐश्वर्यानं एक गोष्ट स्पष्ट केली होती की ‘जर सलमाननं चित्रपटात बाजीरावची भूमिका साकारली तर ती मस्तानीची भूमिका साकारणार नाही. आमचं याविषयी बोलणं झालं आहे. आम्ही दोघांनी पुन्हा एकदा एकत्र येऊन चित्रपटात काम करावे अशी त्यांची इच्छा होती, पण परिस्थीती पाहता मी त्या टीमसोबत काम करू शकत नाही. मी मस्तानी बनायला तयार होते, पण संजय यांना ज्या अभिनेत्याला बाजीराव म्हणून पाहायचे होते त्याच्यासोबत मला काम करायचं नाही.’

हेही वाचा : मॅनेजरच्या लग्नात Hina Khan नं असं काय केलं की नवरदेवाला बसला 1 लाख रुपयांचा फटका?

ऐश्वर्याच्या वक्तव्यावर संयज लीला भन्साळींनी दिले हे उत्तर

करण जोहरला याविषयी सांगत पुढे संजय लीला भन्साळी म्हणाले, ‘ऐश्वर्या मस्तानी बनू शकली नाही याचे मला खूप वाईट वाटले. ती माझ्या कामाचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. पण मी सलमानची मैत्रीही सोडू शकत नाही. मी अडचणीत अडकलो होतो. मलाही ऐश्वर्यासोबत उभे राहायचे होते.

संजय लीला भन्साळी आणि ऐश्वर्याच्या मैत्रीत दुरावा

संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटाच्या वादामुळे ऐश्वर्या आणि त्यांच्या मैत्रीत दुरावा आला. संजय यांनी कॉफी विथ करण मध्ये हे कबूल केलं की ते ऐश्वर्यावर जितकं प्रेम करतात तितकाच त्यांना तिचा राग येतो. करतो. ऐश्वर्यानं चित्रपटाला नकार देता संजय लीला भन्साळी यांनी रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि दीपिका पदुकोणला (Deepika Padukone) या चित्रपटासाठी कास्ट केलं. दरम्यान, आजही सलमान आणि ऐश्वर्या एकमेकांसोबत काम करणं टाळतात. इतर काही कलाकारांप्रमाणे ब्रेकअप झाल्यानंतर ते दोघे एकत्र येऊ शकले नाही. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *