Headlines

अशी कोणती अट होती, ज्यामुळं अमिताभ यांना जया बच्चन यांच्याशी लग्न करावं लागलं?

[ad_1]

Amitabh Bachchan-Jaya Bachchan wedding anniversary: हिंदी कलाजगतातील काही प्रतिष्ठीत कुटुंब आणि जोडप्यांपैकी एक म्हणजे बिग बी अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन आणि त्यांची पत्नी जया बच्चन. सहजीवनाची अनेक वर्षे एकमेकांना साथ देणाऱ्या या जोडीच्या लग्नाबद्दल सर्वांनाच अप्रूप. पहिल्या नजरेतच एकमेकांच्या प्रेमात पडलेल्या या जोडीची पहिली ओळख एका चित्रपटाच्या सेटवर झाली होती. 

‘जंजीर’ हा अमिताभ बच्चन यांची मध्यवर्ती भूमिका असणारा चित्रपट. पण, जया बच्चन यांनी यापूर्वीच सुपरहिट चित्रपट साकारून त्या मोठ्या अभिनेत्रींच्या यादीत बसल्या होत्या. चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान, त्यांची ओळख आणखी घट्ट झाली आणि चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. 

चित्रपट तुफान यशस्वी ठरला, तर आपण सर्व मित्र लंडनला सुट्टीसाठी जाणार असं बिग बी आणि त्यांच्या काही खास मित्रांनी ठरवलं होतं. खुद्द बिग बींनीच याचा खुलासा एका मुलाखतीत केला होता. 

चित्रपटाचं यश साजरा करण्यासोबत एकमेकांसोबत काही खास क्षण व्यतीत करण्यासाठी जया आणि बच्चन यांनीही लंडनची वाट धरली. यापूर्वीच माध्यमांमध्ये बिग बी आणि जया यांच्या प्रेमाची चर्चा सुरु झाली होती. तिथं बच्चन यांच्या वडिलांपर्यंत ही बातमी पोहोचली की काही मित्र आणि जया यांच्यासह अमिताभ लंडनला जात आहेत. 

जयाही येतेय का तुमच्यासोबत? की तुम्ही एकटेच जात आहात?, असा प्रश्न हरिवंशराय बच्चन यांनी बिग बींना विचारला. परदेशातच जायचंच आहे, तर आधी दोघांनीही लग्न उरका आणि यानंतर परदेशात फिरण्यासाठी जा. लगेचच एका ब्राह्मणाची व्यवस्था करण्यात आली. 

लंडनला जाण्यापूर्वी लग्न उरकलं गेलं आणि अशा रितीनं लंडनची सहल या स्टार जोडीसाठी त्यांची हनिमून ट्रीप ठरली. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *