Headlines

83 Movie | वर्ल्ड कप जिंकूनही उपाशीपोटी का झोपले टीम इंडियाचे खेळाडू?

[ad_1]

मुंबई : टीम इंडिया कधी 83 वर्ल्ड कप जिंकेल असं जगात कोणालाच वाटलं नव्हतं. हा विश्वास फक्त त्यावेळीचे कर्णधार कपिल देव यांना होता. त्यांनी आपल्या विश्वासाला कायम ठेवलं आणि टीमला विजय मिळवण्यासाठी प्रोत्साहित केलं. कपिल देव यांची मेहनत फळाला आली आणि टीम इंडियाने 83 चा वर्ल्ड कप जिंकला. 

83 सिनेमाच्या निमित्तानं पुन्हा काही किस्से आणि आठवणी जाग्या झाल्या आहेत. 83 सिनेमा OTT वर आला आहे. या सिनेमाच्या निमित्तानं पुन्हा जुन्या आठवणींना उजाळा देत सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. 

पहिल्यांदाच वर्ल्ड कप जिंकल्याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होता. हा जल्लोष एवढा होता की खेळाडू त्या आनंदात आपली भुकही विसरले होते. त्यावेळी वर्ल्ड कप जिंकल्यानंतरही त्यांच्यावर उपाशीपोटी झोपण्याची वेळ आली होती. 

टीम इंडियाला कमीपणाचं लेखणं हे चुकीचं ठरेल हेच 1983 मध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंनी संपूर्ण जगाला आपल्या कामगिरीतून दाखवून दिलं. 
टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नसली तर क्रिकेटपटूंनी अखेरच्या काही सामन्यात बाजी पलटवली. कपिल देव यांनी त्यावेळी घडलेला एक किस्सा सांगितला जो भावुक करणारा आहे.

 टीम इंडियाने वेस्टइंडिजचा पराभव करून 1983 रोजी झालेल्या वर्ल्ड कप जिंकला. त्यावेळी एकीकडे जिंकण्याचा मोठा आनंद होता. तर दुसरीकडे क्रिकेटपटू उपाशी असल्याने खूप भुकही लागली होती.

वर्ल्ड कप जिंकल्याचा आनंद एवढा मोठा होता की त्यापुढे टीम इंडियाचे खेळाडू भुकही विसरले. सगळेजण त्यादिवशी रात्री उशिरापर्यंत विजयाचा आनंद साजरा करत होते. त्यामुळे त्यांना जेवायचं भानही उरलं नव्हतं. 

विजयाची पार्टी उशिरापर्यंत सुरू राहिली जेव्हा सगळं शांत झालं तेव्हा आपल्याला भुक लागली असल्याची जाणीव झाली. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. त्या दिवशी सर्व क्रिकेटपटू उपाशीपोटी झोपले. त्या दिवशी कोणीच तक्रार केली नाही, कारण या आनंदानं सर्वांनी आपलं पोट भरलं आणि झोपी गेले असा किस्सा कपिल देव यांनी एक मुलाखती दरम्यान सांगितला होता.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *