प्रतिनिधी (आसिफ मुलाणी) -बार्शी तालुक्यातील खरीप हंगामातील पिकाच्या पेरणीसाठी वेळेवर पाऊस झाल्यामुळे शेतकरी आनंदित होता,त्यामुळे शेतकऱ्यांनी खरिप हंगामातील प्रमुख पीक असलेले सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी केली.पेरणी साठी विविध कंपनीचे सोयाबीन बियाणे वापरले परंतु महाबीज कंपनीचे बियाणे ज्या शेतकऱ्यांनी घेऊन पेरले. त्या शेतकऱ्यांचे बियाणे उगवलेच नाही,शेतकऱ्यावर पहिलेच कोरोनाचे संकट आल्याने शेती पिकाला म्हणावा तसा भाव नाही.दुष्काळ निधी पासून अद्यापही तालुक्यातील शेतकरी वंचित आहे,आशा एक ना अनेक संकट वर्षानुवर्षे शेतकऱ्यावर येत असतात परंतु आज शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट उभे आहे.तरी तालुका कृषी अधिकारी व पंचायत समिती कृषी अधिकारी बार्शी यांनी ज्या शेतकऱ्यांनी महाबीज कंपनीचे इतर कंपनीचे सोयाबीन बी उगवले नाही. आशा शेतकऱ्यांचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी व ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे आशा शेतकऱ्यांचे बियाणे घेतलेली पावती,उतारा,व अर्ज,संबंधित विभागाने स्विकारावे म्हणून ग्राहक सेवा समितीचे राहुल भड, तालुका अध्यक्ष बापूसाहेब पवार,ग्राहक सेवा समिती युवक अध्यक्ष अशोक माळी,शिवसेनेचे विभाग प्रमुख दीपक जाधव,व महिला आघाडीच्या लता यादव यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले.