प्रतिनिधी /गजानन आघाव – ग्रामपंचायत दुसरबीड यांच्या हद्दी पूर्ण पूर्ण गावात नालीचे सांडपाणी दूषित झाले आहे.कोरोंना सारखा रोग देशात धुमाकूळ घालत आहे. असे असताना ग्रामपंचायत हद्दीत जागोजागी कचर्याचे ढीग पडलेले आहेत.यामुळे कॉलरा , मलेरिया , कावीळ सारखे अनेक रोग पसरण्याची शक्यता आहे. याबदल नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. तरी ग्रामपंचायत च्या वतीने लवकरात लवकर स्वच्छता करावी ,अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.