Headlines

महिला ही आयडिया वापरून पुरुषांना करतात वश, जाणून घ्या काय सांगते Chanakya Niti

[ad_1]

मुंबई : आचार्य चाणक्य हे (Chanakya) अर्थशास्त्र आणि नीतिशास्त्राचे उत्तम जाणकार होते. आचार्य चाणक्यांनी आपल्या धोरणाच्या जोरावर चंद्रगुप्त मौर्या सारख्या सामान्य मुलाला मगधचा सम्राट बनवलं आणि बलाढ्य धनानंदला हटवून गादीवर बसवलं. आचार्य चाणक्यांच्या चाणक्य नीतीमध्येही नातेसंबंधांचं तपशीलवार वर्णन केले आहे. याशिवाय पती, पत्नी, गुरु, राजा किंवा समाजातील इतर कोणी कसे असावे, हेही चाणक्य नीतीमध्ये सांगितले आहे. चाणक्य नीतीमध्ये ‘बाहुवीर्यबलं राज्ञो ब्राह्मणो ब्रह्मविद् बली। रूप-यौवन-माधुर्यं स्त्रीणां बलमनुत्तमम्।।’ हा एक श्लोक आहे. ज्यामध्ये स्त्री, ब्राह्मण आणि राजा यांची शक्ती सांगितली आहे. 

महिलांची सर्वात मोठी ताकद

चाणक्य नीतीनुसार, कोणत्याही स्त्रीचे सौंदर्य आणि गोड बोलणे ही तिची सर्वात मोठी ताकद असते. ज्या स्त्रीयांमध्ये हे दोन गुण असतात त्यांच्याकडे पुरुष लवकर आकर्षित होतात. सुंदर आणि गोड बोलणाऱ्या स्त्रिया कोणालाही वश करू शकतात. मात्र, या दोन गुणांमुळे त्यांना सर्वत्र मान-सन्मानही मिळतो आणि कुटुंबाचा मानही वाढतो.

ब्राह्मणाची शक्ती काय आहे?

आचार्य चाणक्यांनी चाणक्य नीतीमध्ये सांगितले आहे की ब्राह्मणाची सर्वात मोठी शक्ती म्हणजे त्याचे ज्ञान. ब्राह्मणांना त्यांच्या ज्ञानामुळे समाजात मान मिळतो. ब्राह्मणाकडे जितके जास्त ज्ञान असेल तितकाच त्याला अधिक आदर मिळतो कारण प्रतिकूल परिस्थितीत प्रत्येकजण त्याला सोडून जातो, परंतु ज्ञान त्याला कधीच सोडत नाही, त्याला त्या परिस्थितीतून बाहेर पडण्यास मदत करते. ब्राह्मणासाठी ज्ञान ही त्याची ठेव आहे.

राजामध्ये कोणते गुण असायला हवे

चाणक्य नीतीनुसार, राजाची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्याची स्नायू शक्ती. राजाला सेनापतीपेक्षा मंत्री-वरिष्ठही असतो, पण राजा दुर्बल असेल तर तो राज्य करू शकणार नाही. राज्य चालवायचे असेल तर राजा शक्तिशाली असणे आवश्यक आहे. राजा शक्तिशाली असेल तर त्याला राज्य करणे सोपे जाते.

(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *