बार्शी प्रतिनिधी –महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वाहकाकडून तिकीट विक्रीद्वारे मिळणारे उत्पन्न हे महामंडळाचे कायदेशीर उत्पन्न आहे. या उत्पन्नाला गळती लागू नये व महामंडळ आपल्या उत्पन्नापासून वंचित होऊ नये म्हणून मार्गावरील कामगिरी करणाऱ्या सर्व वाहकांची तपासणी करणेकरिता रा. प. बार्शी आगाराच्या वतीने मार्ग तपासणी पथके तयार करण्यात आली आहेत. त्यामध्ये रा.प.म.च्या प्रवाशांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी व प्रवाशांनी विनातिकीट प्रवास करू नये या बाबींना आळा घालण्यासाठी दि. २२/०९/२०२१ ते ६/१०/२०२१ (पंधरवडा मोहीम) प्रवासी तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे.
- प्रेम आणि नात्याचा अनुबंध उलगडणारा ‘लेक असावी तर अशी’, ट्रेलर तुम्ही पाहिलात का?
- 32 वर्षांपासून बेपत्ता आहे ‘हा’ अभिनेता; कोण म्हणालं वेड्यांच्या इस्पितळात कोण, म्हणालं रस्त्यांवर दिसला, सत्य काय?
- ‘कभी खुशी कभी गम’मधील शाहरुख- काजोलचा ऑनस्क्रीन मुलगा आता कायच्या काय हॅण्डसम दिसू लागलाय, Photo पाहिले?
- ‘Chamkila’ चित्रपट आणि अमिताभ बच्चन यांचं काय आहे कनेक्शन?
- 2 महिन्यानंतर कोमातून बाहेर आली 25 वर्षीय Adult Star; ‘त्या’ रुममध्ये फेब्रुवारीत काय घडलं? गूढ कायम
तरी रा. प. बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी विना तिकीट प्रवास करू नये. आपली तिकिटे प्रवास पूर्ण होईपर्यंत जपून ठेवावीत तसेच मोटार वाहन कायदा १९८८ नुसार विनातिकीट प्रवास करणाऱ्या व्यक्तीकडून त्याने चुकविलेल्या प्रवास भाड्याच्या व्यतिरिक्त प्रवास दुप्पट भाडे किंवा रक्कम रु. १०० यापैकी जी रक्कम अधिक असेल ती रक्कम दंड म्हणून वसूल करण्यात येणार असल्याची माहिती आगार प्रमुख मोहन वाकळे व स्थानक प्रमुख स्मिता मिसाळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.