मृत्यूनंतरच संपली ‘या’ अभिनेत्याची Love Story; जिच्यावर प्रेम केलं तीसुद्धा अखेरच्या क्षणी सोबत नव्हती
मुंबई : प्रेम…. फक्त भावनाच नाही, तर एक अनुभव आहे. हे प्रेम एकतर तुम्हाला खूप काही देऊन जातं. किंवा मग तुमच्याकडून सर्वकाही हिरावून घेतं. हिंदी चित्रपटसृष्टीत आपण अशी बरीच उदाहरणंही पाहिली असतील. पण, प्रेमाच्या आणाभाकांचा उल्लेख झाला, की एका नात्याची हमखास चर्चा होते. हे एक असं नातं ज्याची चर्चा खूप झाली, पण शेवट मात्र वाईट…