भाज्या आणखी महागण्याची भीती ; अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान; आवक ४० टक्क्यांनी घटली
ठाणे, नाशिक,पुणे : महिन्याच्या सुरुवातीपासून सक्रिय झालेल्या मोसमी पावसाचा तडाखा राज्यातील शेतीला बसला आहे. सुमारे दोन लाख ३३ हजार ८९७ हेक्टरवरील खरीप हंगामातील पेरण्यांसह, नगदी पिके आणि फळबागांचे पावसामुळे प्रचंड नुकसान झाले असून शहरांकडे जाणारे महामार्ग कोंडल्यामुळे भाजी-पाल्याच्या पुरवठय़ावर परिणाम झाला आहे. त्यामुळे भाज्यांच्या घाऊक दरांत वाढ झाली आहे. परिस्थिती अशीच राहिली तर येत्या दोन-तीन…