रत्नागिरीच्या भगवती किल्ल्यासमोर विवाहित महिलेचा संशयास्पद मृत्यू
रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील खालचा पगारवाढ येथून चार दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या ३३ वर्षीय विवाहितेचा छिन्नविच्छिन्न अवस्थेतील मृतदेह सोमवारी भगवती किल्ल्यासमोरील ‘कपल पॉइंट’खालच्या दरीत आढळल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या विवाहितेने आत्महत्या केली की घातपात झाला, याचा शोध शहर पोलिसांनी सुरू केला आहे. दरम्यान घातपाताच्या शक्यतेने या प्रकरणी दोघा संशयितांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असल्याचे समजते….