अतिवृष्टी मध्ये पिकाचे नुकसान झाले असेल तर तात्काळ विमा कंपनीकडे दावा करण्याचे शिवार हेल्पलाइन चे आवाहन ७२ तासाच्या आत दावा करण्याची अट
उस्मानाबाद :- गेल्या एक दोन वर्षापासून शेतकऱ्यांवर संकटांची मालिका सतत सुरू आहे. कोरोना च्या वेगवेगळ्या लाटा, अवकाळी पाऊस, शेतमालाला भाव न मिळणे, वाढलेले खते/बियाणे चे दर इत्यादी विषय बळीराजा मागे हात धुवून लागले आहेत. पेरणी झाली की पावसाने उघडीप दिली आणि अचानक उस्मानाबाद जिल्ह्यात शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. पाडोळी (आ.), सलगरा, ईटकळ,…