T20 World Cup 2022: भारतीय संघाला हे 3 खेळाडू जिंकवून देणार टी20 वर्ल्डकप

[ad_1]

T20 World cup 2022: टी-20 वर्ल्डकप सुरु होण्यासाठी काही दिवस उरले आहेत. त्यातच भारतीय संघ ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामने खेळत आहे. या दरम्यान भारतीय संघात कोणत्या खेळाडूंना स्थान मिळेल हे स्पष्ट होणार आहे. कारण बरेच खेळाडू आहेत ज्यांच्या विषयी संभ्रम आहे. भारतीय संघाला वर्ल्डकप (T20 world cup) जिंकण्यासाठी सर्वच फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी करावी लागणार आहे. पण बॅटींगबाबत बोलायचं झालं तर भारतीय क्रिकेट संघाचे तीन खेळाडू आहेत, ज्यांच्याकडे 2007 नंतर पुन्हा एकदा भारताला T20 विश्वचषक ट्रॉफी जिंकून देण्याची ताकद आहे.

भारताला 23 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळायचा आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया यावेळी टी-20 विश्वचषक जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहे. टीम इंडियाचे तीन खेळाडू आहेत, जे संपूर्ण T20 विश्वचषकात रोहित शर्मासाठी सर्वात मोठे शस्त्र ठरणार आहेत. यामध्ये पहिलं नाव आहे सूर्यकुमार यादव याचे.

1. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav)

सूर्यकुमार यादवच्या रूपाने भारताला असा स्फोटक फलंदाज मिळाला आहे, जो मैदानात 360 ड्रिग्री शॉट्स खेळतो. सूर्यकुमार यादव टी-20 विश्वचषक 2022 मध्ये भारताचा सर्वात मोठा खेळाडू ठरू शकतो. सूर्यकुमार यादव एबी डिव्हिलियर्स प्रमाणेच खेळतो. सूर्यकुमार यादवसारखा खेळाडू मिळणे फार कठीण आहे. असं अनेकांना वाटतं. सूर्यकुमार यादवसारख्या प्रतिभावान फलंदाजाला मैदानाभोवती अनेक शॉट्स खेळून धावा काढण्याची कला अवगत आहे.

2. विराट कोहली (Virat Kohli)

T20 विश्वचषक 2022 मध्ये, स्टार फलंदाज विराट कोहली कर्णधार रोहित शर्माचा सर्वात मोठे शस्त्र असणार आहे. विराट कोहली फॉर्ममध्ये परतला असून अलीकडेच त्याने अफगाणिस्तानविरुद्धच्या आशिया कप सामन्यातही शतक झळकावले. या सामन्यात विराट कोहलीने 122 धावांची स्फोटक खेळी खेळली. टी-20 विश्वचषकात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणारा विराट कोहली टीम इंडियाला मजबूत करेल आणि विरोधी गोलंदाजांसाठी तो एक कौल ठरेल.

3. हार्दिक पंड्या (Hardik Pandya)

हार्दिक पांड्या टी-20 विश्वचषक 2022 मध्ये भारताचा सर्वात मोठा सामना सामना वीर ठरु शकतो. T20 वर्ल्ड कप 2022 मध्ये हार्दिक पांड्या मोठी भूमिका बजावू शकतो. जेव्हा तुम्हाला एखादी मोठी स्पर्धा जिंकायची असते तेव्हा तुम्हाला नेहमी शेवटपर्यंत टिकून राहणाऱ्या खेळाडूंची गरज असते आणि तो म्हणजे हार्दिक पांड्या. गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही बाबतीत हार्दिक पांड्या सर्वोत्तम आहे. हार्दिक त्याच्या बॅटने अधिक खेळतो कारण जेव्हा जेव्हा भारताला वेगवान धावांची गरज असते तेव्हा त्याच्यासोबत हार्दिक असतो. गोलंदाजांविरुद्ध मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यात धावा काढण्याची क्षमता त्याच्यात आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *