
सोलापूर – ९ सप्टेंबर रोजी मुंबईत साकीनाका येथे घडलेल्या एका अत्यंत धक्कादायक घटनेत महिलेवर अमानुष अत्याचार करण्यात आला. अत्याचार करून पिडीतला लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. अखेर त्या महिलेचा उपचारादरम्यान राजावाडी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. मुंबईसह महाराष्ट्र आणि देश हादरवणाऱ्या या घटनेचा स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) सोलापूर जिल्हा कमिटी तीव्र निषेध करत . सदरील प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी एसएफआय वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्यावतीने मा. नायब तहसीलदार सचिन लटके यांना देण्यात आहे.
निवेदनात म्हटले आहे की केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकार महिलांवरील अत्याचार रोखण्यात अपयशी ठरले आहे. नुकतीच दिल्लीत घडलेली घटना, पुण्यातील वानवडी, खेड, हैदराबाद येथील सैदाबाद आणि देशात – राज्यात अनेक ठिकाणी होत असलेल्या महिला अत्याचाराच्या घटनांनी देशभरात महिला सुरक्षित नसल्याचे स्पष्ट होते. महिलांवरील अत्याचार रोखण्यास अपयशी ठरलेल्या केंद्र आणि राज्य सरकारचा एसएफआय ही विद्यार्थी संघटना तीव्र धिक्कार करते.
- IPL 2022 | केकेआरला मोठा झटका, हा खेळाडू आयपीएल 2022 मधून बाहेर
- अँड्र्यू सायमंड्सच्या मृत्यूचे गूढ वाढले, बहिणीचा धक्कादायक सवाल
- Bharti Singh mocking beard-moustache : कॉमेडियन भारती सिंहच्या अडचणीत वाढ, ‘तो’ जोक पडला महागात
- बॉलीवूड इंडस्ट्रीचं असं सिक्रेट्स, जाणून उडेल तुमची झोप
- Aadhaar Card: आता मराठीत बदलू शकता आधार कार्डवरील माहिती, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस
मुंबईतील महिला अत्याचार प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा करा. महिला अत्याचाराला कायमचा आळा घालण्यात यावा. शासन स्तरावर कठोर कायदा झाली पाहिजे. जर या प्रकारे कायदा व कारवाई नाही झालं तर आम्ही येणाऱ्या काळात महिला व विद्यार्थ्यांना घेऊन रस्त्यावर सरकारी व लोकप्रतिनिधिचे गाड्या फिरू देणार नाही. असा इशारा एसएफआय कडून देण्यात आला.
यावेळी एसएफआय चे मा. सचिव नम्रता निली, जिल्हा सचिव मल्लेशम कारमपुरी, जिल्हाध्यक्ष राहुल जाधव, सहसचिव शामसुंदर आडम, स.मं.सदस्य राहुल भैसे, जि.क.सदस्य अश्विनी मामड्याल, श्रुतिका बल्ला इ. कार्यकर्ते उपस्थित होते.