Headlines

क्रांतिवीर वीर सिंदूर लक्ष्मण स्मृतीशताब्दी वर्षास 15 जुलैपासून सुरुवात ; वर्षभर महाराष्ट्रात विविध उपक्रम राबवणार कॉम्रेड धनाजी गुरव

भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी हजारो क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची बाजी लावून लढा दिला.स्वातंत्र्य लढ्यात सुमारे साडेतीन लाख हुतात्म्यांनी देशासाठी आपले प्राण वेचले. परंतु त्यातील काही मोजक्याच क्रांतिवीरांची दखल इतिहासाने घेतली. तर कित्येकांचा साधा नामोल्लेखही कुठे दिसून येत नाही.अशापैकीच सांगली जिल्ह्याच्या दुष्काळी जत तालुक्यातील सिंदूर येथील भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक महान पण उपेक्षित क्रांतीवीर वीर सिंदूर लक्ष्मण यांच्या हौतात्म्यास 15 जुलै 2022 ला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत.त्यांच्या या स्मृती शताब्दी वर्षाला 15 जुलै 2021पासून प्रारंभ होत आहे. तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रात वीर सिंदूर लक्ष्मण यांचे स्मृती शताब्दी वर्ष विविध प्रबोधनपर उपक्रमांनी साजरे करणार असल्याची घोषणा विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे कार्याध्यक्ष कॉम्रेड धनाजी गुरव यांनी सिंदुर ता.जत येथे केली.सिंदूर ग्रामस्थ, ग्रामपंचायत व विद्रोही सांस्कृतिक चळवळ यांच्या संयुक्तपणे झालेल्या वीर सिंदूर लक्ष्मण स्मृती शताब्दीच्या पूर्वतयारी संदर्भातील व्यापक बैठकीत ते बोलत होते.

हे ही वाचा

अध्यक्षस्थानी सिंदूर चे सरपंच गंगाप्पा हारुगेरी होते. धनाजी गुरव यांनी महाराष्ट्र ही क्रांतीकारकांच्या संघर्षमय लढ्याची भूमी असून ब्रिटिशांना सळो कि पळो करून सोडणार्‍या सातारा प्रतिसरकारच्या क्रांतिसिंह नाना पाटील, जी.डी. लाड, नागनाथअण्णा नायकवडी पासून या जिल्ह्याच्या गाव खेड्यापर्यंत इंग्रजांच्या विरुद्ध लढणारी कितीतरी क्रांतिकारक होते की त्यांनीं आपल्या देशासाठी त्यागमय असे योगदान दिलेले आहे. यापैकीच सिंदूरचा ‘वीर सिंदूर लक्षमण’हा एक अत्यंत लढाऊ असा क्रांतिवीर होऊन गेलेला आहे.त्याचा महाराष्ट्रालाच नव्हे तर इतिहासालाच विसर पडला आहे ही चिंतेची बाब आहे.

यावेळी इतिहास अभ्यासक प्रा.गौतम काटकर यांनी वीर सिंदूर लक्ष्मण च्या क्रांतिकार्यातील लढ्याची माहिती या बैठकीत दिली.तसेच 15 जुलै 2021 रोजी त्यांचे जन्मगाव असलेल्या याच सिंदूर येथूनच ‘वीर सिंदूर लक्ष्मण यांच्या जन्मभुमीला अभिवादन करून स्मृती शताब्दी वर्षाला प्रारंभ होणार असल्याचे सांगितले.बैठकीत स्मृती शताब्दी वर्षांचे कार्यक्रम व आराखडा याबाबत सविस्तर चर्चा झाली. यावेळी झालेल्या चर्चेत कॉम्रेड मारुती शिरतोडे ,प्रा. दादासाहेब ढेरे, सुरेंद्र सरनाईक ,दगडू जाधव, हिम्मतराव मलमे ,बाबुराव जाधव ,नितीन चंदनशिवे, आदित्य माळी, सोनंद सर, विशाल शिरतोडे ,इतिहास संशोधक मानसिंगराव कुमठेकर, विक्रम शिरतोडे , पाटील सर ,मगदूम सर व सिंदूरच्या ग्रामस्थांनी सहभाग घेतला.बैठकीनंतर वीर सिंदूर लक्ष्मण च्या घराला विद्रोही सांस्कृतिक चळवळ व आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेडच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भेट देऊन वारसांशी चर्चा केली.या बैठकीचे संपूर्ण संयोजन क्रांतीवीर वीर सिंदूर लक्ष्मण स्मारक समितीचे अध्यक्ष बी.आर. पाटील सर व सूत्रसंचालन प्रा.हणमंत मगदूम सर यांनी केले.यावेळी महादेव बालीकाई,सुरेश मुडशी,आप्पासो जनगोंड,सुरेश काडगोंड,दयानंद बाबानगर आव्वाना कांबळे,शिवानंद हारुगिरी,भिमन्ना सुतार,अकबर मुल्ला,आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *