Headlines

समांथाच्या वडिलांचा फी भरण्यास नकार अन्.., अभिनेत्रीचं बदललं आयुष्य

[ad_1]

मुंबई : दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. समांथाने नुकतीच बॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक करण जोहरच्या (Karan Johar) ‘कॉफी विथ करण ७’ (Koffee With Karan 7) मध्ये हजेरी लावली होती. समांथा आता फक्त दाक्षिणात्य अभिनेत्री नाही तर तिचं नाव देशातल्या लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत आहे. पण शोमध्ये हजेरी लावल्यानंतर समांथाने खुलासा केला की तिच्या वडिलांनी सांगितलेल्या काही गोष्टींमुळे तिचं आयुष्य बदललं. 

तिसर्‍या एपिसोडमध्ये करण जोहरने समांथाला विचारले की तिला अभिनेत्री व्हायचे आहे असा तिने विचार केला होताा का? याला उत्तर देत समांथा म्हणाली, तिचं कुटुंब आर्थिकदृष्ट्या खंबीर नव्हतं. या कारणामुळे तिला 
अभिनय क्षेत्रात काम करिअर करावं लागलं. तिच्या पुढच्या शिक्षणासाठी पैसे नव्हते. समांथाच्या वडिलांनी तिच्या शिक्षणाची फी भरण्यास नकार दिल्याचा खुलासा समांथाने केला. त्या गोष्टीमुळे समांथाचं आयुष्य कायमचं बदललं.

याविषयी सांगताना समांथा म्हणाली, ‘घरची परिस्थिती बिकट होती म्हणून माझ्याकडे कोणताही पर्याय नव्हता. पुढे शिक्षण घेण्यासाठी आमच्यकडे फारसे पैसे नव्हते. जेव्हा माझी वडील म्हणाले की, मी तुझी फी भरू शकत नाही आणि त्यांच्या या शब्दांनी माझं आयुष्य बदललं.  याशिवाय, ‘कॉफी विथ करण’मध्ये, समांथाने तिच्या पूर्वाश्रमीचा पती नागा चैतन्यपासून घटस्फोट घेतल्यानंतर होणाऱ्या ट्रोलिंगवर म्हणाली, ‘मी खरोखरच याबद्दल तक्रार करू शकत नाही.

करण जोहरने समंथाला विचारलं की, जेव्हा ती नागा चैतन्यपासून वेगळी झाली तेव्हा तिला ट्रोल होण्याची भीती वाटत होती का? प्रत्युत्तरात सामंथा म्हणाली की, तिचं आयुष्य चाहत्यांसमोर उघडं ठेवणं ही तिची निवड होती आणि म्हणून ती याबद्दल तक्रार करू शकत नाही कारण सर्व काही पारदर्शक ठेवण्याचा तिचा निर्णय होता. म्हणूनच नागा चैतन्यपासून विभक्त झाल्यावर जे घडलं त्याबद्दल ती तक्रार करू शकत नाही किंवा दुःखी होऊ शकत नाही. कारण तिच्या आयुष्यात लोकांनी आणि चाहत्यांनी खूप गुंतवणूक केली होती.

दरम्यान, या आधी समांथानं तिच्या आणि नागा चैतन्यच्या नात्याविषयी आणि त्याचसोबत त्यांच्या घटस्फोटाविषयी अनेक गोष्टींचा खुलासा केला. काही वर्षे डेट केल्यानंतर समांथा रुथ प्रभूने 2017 मध्ये नागा चैतन्यसोबत लग्न केलं होतं. पण 2 ऑक्टोबर 2021 रोजी समांथा आणि नागा यांचा घटस्फोट झाला. त्या दोघांच्या मनात एकमेकांविषयी कशा भावना आहेत या विषयी विचारता समांथा म्हणाली, ‘सध्या आमच्या मनात एकमेकांबद्दल तीव्र भावना आहेत. म्हणजे आता जर तुम्ही आम्हा दोघांना एका खोलीत बंद केलं तर तुम्हाला आमच्यापासून  धारदार गोष्टी लपवाव्या लागतील. सध्या परिस्थिती चांगली नाही. कदाचित भविष्यात काहीतरी बदलेल.’



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *