कारी / प्रतिनिधी – शेतातील बंद पत्र्याच्या शेडचे कुलूप तोडून पत्र्याच्या शेड मधील सोयाबीनचे तब्बल११७ कट्टे चोरट्यांनी लंपास केले. हा प्रकार उस्मानाबाद तालुक्यातील कारी शिवारात घडला.
प्रभाकर महादेव गादेकर (वय४५) यांनी याबाबत पांगरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.फिर्यादी हे रात्री ७ वाजण्याच्या सुमारास गट नंबर ७६३ मधील पत्र्याच्या शेड मधील खोलीत १२० कट्टे सोयाबीन ठेऊन खोलीला कुलूप लावून , गावातील राहते घरी निघून गेले.
त्यानंतर सकाळी ६ वाजता शेतात काम करणारा शेतगडी आणि फिर्यादी शेतामध्ये आले असता त्यांना पत्र्याच्या शेडमधील खोलीचे कुलूप तोडलेले दिसून आले. त्यांनी खोलीमध्ये जाऊन पाहिले असता पत्र्याच्या शेडमध्ये ठेवलेले सोयाबीनच्या १२० कटयापैकी ३ कट्टे मिळून आले. बाकीचे ११७ कट्टे दिसले नाहीत.
- प्रेम आणि नात्याचा अनुबंध उलगडणारा ‘लेक असावी तर अशी’, ट्रेलर तुम्ही पाहिलात का?
- 32 वर्षांपासून बेपत्ता आहे ‘हा’ अभिनेता; कोण म्हणालं वेड्यांच्या इस्पितळात कोण, म्हणालं रस्त्यांवर दिसला, सत्य काय?
- ‘कभी खुशी कभी गम’मधील शाहरुख- काजोलचा ऑनस्क्रीन मुलगा आता कायच्या काय हॅण्डसम दिसू लागलाय, Photo पाहिले?
- ‘Chamkila’ चित्रपट आणि अमिताभ बच्चन यांचं काय आहे कनेक्शन?
- 2 महिन्यानंतर कोमातून बाहेर आली 25 वर्षीय Adult Star; ‘त्या’ रुममध्ये फेब्रुवारीत काय घडलं? गूढ कायम
बंद पत्र्याच्या शेडचे कुलूप तोडून आत प्रवेश करून सोयाबीनचे कट्टे चोरल्याबाबत अज्ञात आरोपींविरोधात पांगरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.