Headlines

नाशिककरांनो काळजी करू नका वटवृक्ष वाचला आहे ; उड्डाणपुलाच्या आराखड्यात बदल करून घेतला जाईल अंतिम निर्णय : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

[ad_1]

दि.28 जानेवारी,2022 (नाशिक जिमाका वृत्तसेवा): नाशिककरांनो काळजी करू नका झाड वाचलं आहे, अशी भावनिक साद घालत, जलतरण तलाव ते त्रिमूर्ती चौक येथील प्रस्तावित उड्डाण पुलाच्या आराखड्यात बदल करून अंतिम निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.

तिडके नगर येथील उंटवाडी म्हसोबा महाराज देवस्थानभोवती दोनशे वर्षांपूर्वीच्या वटवृक्षाच्या  पाहणी प्रसंगी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे बोलत होते. यावेळी नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री  एकनाथ शिंदे, कृषिमंत्री दादाजी भुसे, पोलीस आयुक्त दिपक पांडे्य, कालिका मंदिराचे अध्यक्ष अण्णासाहेब पाटील, म्हसोबा मंदिर समितीचे ट्रस्टी प्रवीण जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, तिडके नगर येथील उंटवाडी म्हसोबा महाराज  देवस्थानाभोवती असलेला वटवृक्ष हा अंदाजे दोनशे वर्षांपेक्षा जास्त वयाचा आहे. अशा प्राचीन वृक्षाचे अनन्यसाधारण महत्त्व असल्याने हा महावृक्ष वाचवून उड्डाण पुलाची रचना केली जाईल. तसेच शंभर वर्षांपूर्वीची सर्व झाडे वाचली पाहिजे यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. पर्यावरण संवर्धनाचा विचार करूनच शाश्वत विकास कामांवर भर देण्यात येईल असेही श्री. ठाकरे यावेळी म्हणाले.

पुढे बोलतांना पर्यावरण मंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, नाशिक शहरातील इतरही झाडे वाचविण्यासाठी महानगरपालिकेच्या नवीन आराखड्यात नियोजन करण्यात येईल. नंदिनी नदीची संपूर्ण पाहणी करत असताना पर्यावरण मंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, औरंगाबादच्या धर्तीवर लोकसहभागातून नंदिनी नदीची स्वच्छता झाल्याची करण्यात येईल.

000

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *