Headlines

मी मोठ्या चुका केल्या…. नागा चैतन्यशी वेगळं होणारी समंथा असं का म्हणालेली?

[ad_1]

मुंबई : फक्त दाक्षिणात्य नव्हे, तर संपूर्ण देशभरातील चित्रपट रसिकांसाठी  अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आणि अभिनेता नागा चैतन्य यांच्या नात्याचं कुतूहल पाहायला मिळालं. सर्वांच्याच आवडीची ही जोडी. त्यांच्या कधीच दुरावा येणार नाही, असं अनेकांनी ठामपणे सांगितलंही. पण, शेवटी व्हायचं तेच झालं. (Samantha Ruth Prabhu Naga Chaitanya)

समंथा आणि नागा चैतन्य या दोघांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण या वैवाहिक नात्यातून वेगळं होत असल्याचं सांगितलं. 

आपल्यातील मैत्रीच्या नात्याला दुजोरा देत नात्यात असणारे बंध कायम खास असतील, असंही त्या दोघांनी म्हटलं. पण, फक्त आपण यापुढे पती- पत्नी म्हणवणार नाही, हेसुद्धा त्यांनी अधोरेखित केलं. 

अनेकांसाठी हा धक्का होता. काहींनी तो पचवला, तर काहीजण आजही समंथा आणि नागा चैतन्य एकत्र येतील अशी आशा बाळगून आहेत. 

या दोघांनीही वेगळ्या वाटा निवडल्या आणि त्यानंतर त्यांच्या अनेक व्हिडीओ समोर आल्या. जिथं खरंच यांचा घटस्फोट का झाला हाच प्रश्न पडला. 

नागा चैतन्यनं आपल्याला मोठ्या चुका करतानाही पाहिलंय, तो नवरा होण्यासाठी अतिशय योग्यच आहे, असं ती म्हणाली होती. एका मुलाखतीत तिनं हे वक्तव्य केलं होतं. 

समंथाच्या या वक्तव्यानं अनेकांच्याच नजरा वळवल्या होत्या. ‘चै नवरा होण्यासाठी अतिशय योग्य मुलगा आहे. त्याने मला शुन्यातून वर येताना पाहिलंय. 

मला आठवतंय अमेरिकेतून आईला फोन करण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते. मी त्याच्या फोनवरुन आईशी बोलले होते. त्यानं मला अशा परिस्थितीतून पाहिलंय. 

बाकी सर्व लोकं मला पूर्ण ओळखत नाहीत. त्यानं मला मोठ्या चुका करतानाही पाहिलंय’, असं ती एका मुलाखतीत म्हणाली होती. 

समंथा आणि नागा चैतन्यने एकमेकांच्या प्रेमाच्या बळावर हे नातं सुरु केलं खरं. पण, नात्यांची ही वीण काही वर्षांतच त्यांना विभक्त होण्याच्या वळणावर घेऊन आली. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *