[ad_1]
Mumbai News Live Updates : महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी आणि पावसाचे ताजे अपडेट…
उद्धव ठाकरेंनी औरंगाबादला संभाजीनगर, उस्मानाबादला धाराशीव आणि नवी मुंबई विमानतळाला दी बा पाटील यांचं नाव देण्यासंबंधी घेतलेले निर्णय रद्द केले असल्याचं खरं असेल तर हे सरकार हिंदुत्वद्रोही आणि महाराष्ट्रद्रोही आहे अशी टीका शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर शेलक्या शब्दांमध्ये टोला लगावला आहे. गुरुवारी सायंकाळी मुंबईमध्ये पत्रकारांशी चर्चा करताना सुळे यांनी देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांसमोरील माईक खेचल्याच्या प्रकरणावरुन सत्ताधाऱ्यांना शाब्दिक चिमटा काढला.
“आम्ही भाजपासोबत निवडणुका लढल्या होत्या, त्यामुळे गेल्या १५ दिवसात जे झालं ते अडीच वर्षांपूर्वीच व्हायला हवं होतं. आपण चुकीच्या मार्गाने चाललो असल्याचं सर्वांचं म्हणणं होतं. अनेकजण हे घातक असून यात बदल करण्याची मागणी करत होते. सहा महिन्यातच जे सोबत आहेत ते बगलेमध्ये धरुन मुंडी दाबत असल्याचं समजत होतं. त्यांनी संपवण्याचा निर्धार केला असल्याचं लक्षात आलं,” असा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला.
एकीकडे राजकीय आरोप-प्रत्यारोप जोरात सुरु आहे. तर दुसरीकडे राज्यात पावसाची हजेरी सर्वत्र कायम आहे. राज्यातील अशा विविध घडामोडींचे सर्व ताजे अपडेट्स एका क्लिकवर…
Live Updates
Maharashtra Breaking News Today : राज्यातील विविध घडामोडींचे सर्व ताजे अपडेट एका क्लिकवर…
[ad_2]