Headlines

JEE, NEET आणि अंतिम वर्षाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात यावा – एसएफआय

सोलापूर/शाम आडम  – स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) सोलापूर जिल्हा कमिटीच्या वतीने जेईई, नीट व अंतिम वर्ष परीक्षा निर्णयाच्या विरोधात आज निषेध निदर्शने करून मा. संदीप लटके नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.आज ०२ सप्टेंबर रोजी संपूर्ण देशभरात जेईई, नीट व अंतिम वर्ष परीक्षा या परीक्षा घेण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाच्या विरोधात देशव्यापी विविध ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्याची हाक एसएफआय व सर्व डाव्या पुरोगामी विद्यार्थी संघटनांनी दिली आहे. 
 देशात कोरोना (कोविड – 19) महामारीचे भीषण संकट समोर असताना दररोज रुग्णांची संख्या झपाट्याने महाराष्ट्रासह देशभरात वाढत आहे. अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्याची कसलीच काळजी न करता केंद्र शासनाने जेईई, नीट व अंतिम वर्ष परीक्षा घेण्याचे ठरवले आहे. मोदी सरकारच्या अशा आडमुट्या भूमिकेला जोरदार विरोध करण्यासाठी देशातील सर्व विद्यार्थी संघटना व विद्यार्थी एकत्र येऊन या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात. तसेच विद्यार्थ्यांच्या इतर महत्त्वाच्या शैक्षणिक मागण्या घेवून एसएफआय व डाव्या विद्यार्थी संघटनांच्या नेतृत्वात आज देशव्यापी आंदोलन करीत आहोत.     
प्रमुख मागण्या :
1) JEE, NEET च्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात. 
2) अंतिम वर्षाच्या परीक्षा किमान दोन महिने पुढे ढकलण्यात याव्यात.
3) परीक्षा घेण्यासाठी पर्यायी व्यवस्थेचा देखील विचार व्हावा. जसे की असाईटमेंटच्या माध्यमातून परीक्षा घेता येईल. ते सबमिट करण्यासाठी ग्रामीण भागातील ग्रामपंचायत कार्यलयात संगणक व इंटरनेटची व्यवस्था करता येईल. जेणेकरून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही.
4) काही अपरिहार्य कारणास्तव काही विद्यार्थ्यांना वेळेत परीक्षा देता येत नसेल तर त्यांना तसा वेळ वाढवून देण्यात यावा.
5) अपंग विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी विशेष सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात.
6) सरकारने परिक्षेदरम्यान विद्यार्थ्यांच्या प्रवासाची मोफत व्यवस्था करावी. 
7) परिक्षेदरम्यान सर्व विद्यार्थ्यांच्या मोफत निवासाची आणि भोजनाची व्यवस्था करण्यात यावी.
8) सर्व परीक्षा केंद्रे सॅनिटाईझ करावेत. विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करावी. त्यांना महामारीची लागण होणार नाही याची संपूर्ण काळजी घेण्यात यावी. 
9) परीक्षा देण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहू नये याची दक्षता घेण्यात यावी. 
10) परिक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना काही धोका निर्माण झाल्यास आरोग्य विमा देण्यात यावा. 
11). पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ संलग्नित 108 महाविद्यालयातुन 22 हजार विद्यार्थी अंतिम वर्ष परीक्षा देणार असून या सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात यावी.
 सर्व मागण्या तात्काळ मान्य कराव्या . अन्यथा एसएफआय च्या वतीने येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन देशभरात करण्यात येईल. असा इशारा देण्यात आला.यावेळी एसएफआय चे जिल्हा सचिव मल्लेशम कारमपुरी, सहसचिव शामसुंदर आडम, पल्लवी मासन, जि. क. सदस्य दुर्गादास कनकुंटला, पूनम गायकवाड, अश्विनी मामड्याल, लक्ष्मी रच्चा, प्रिया कीर्तने इ. कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *