Headlines

फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदासाठी शिंदे यांना या कारणांमुळे पाठिंबा, नेमकं कारण जाणून घ्या!

[ad_1]

मुंबई : Devendra Fadnavis Eknath Shinde : महाराष्ट्रातील राजकीय संकटाचा शेवट सस्पेन्सने भरलेला होता. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला तेव्हा भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस हे राज्याचे पुढील मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होतील, असे मानले जात होते. मात्र भाजपने सर्वांना चकित करत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदासाठी पाठिंबा दिला. तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री केले.

देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत आपण किंग होणार नाही, किंगमेकरच राहणार असल्याचे स्पष्ट केले. हिंदुत्वाची विचारधारा पुढे नेण्याबाबतही फडणवीस म्हणाले. फडणवीस यांच्या या निर्णयाचे राजकीय पंडितांकडून कौतुक होत होते. मात्र, पक्षाच्या वरिष्ठांना विनंती करताच फडणवीस यांना सत्तेत सहभागी व्हावे लागले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी सरकारमध्ये सहभागी होणार नाही. मात्र, नवीन सरकारला सर्व आघाड्यांवर यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन. गेल्या अडीच वर्षांपासून रखडलेली विकासकामे मी पुन्हा सुरु करणार आहे. फडणवीस सरकारमध्ये सहभागी होऊ इच्छित नव्हते, परंतु भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विनंतीनंतर त्यांनी उपमुख्यमंत्री होण्याचे मान्य केले. 

फडणवीस यांना सत्तेबाहेर का राहायचे होते?

मुख्यमंत्रिपदाचा त्याग करुन देवेंद्र फडणवीस यांनी वाहवा मिळवली. मात्र, फडणवीस यांच्याबाबतीत जे झाले ते चांगले झाले नाही, असे काहींचे मत आहे. त्यांना मुख्यमंत्री बनवायला हवे होते. यापूर्वी मुख्यमंत्री राहिलेला असा नेता शिंदे यांच्या हाताखाली कसा काम करणार? पण या सर्व गोष्टींवर चर्चा होत आहे. 

 सरकारबाहेर राहण्याचा निर्णयामागे हे कारण…

देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांच्याकडून एक धडा मिळाला आहे, हे एक कारण असू शकते की त्यांना नवीन सरकारमध्ये किंगऐवजी किंगमेकर व्हायचे होते. एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिल्याने ते पुढे न येता प्रमुख निर्णय घेणारे ठरतील, असा विश्वास फडणवीस यांना असावा. 

दुसरे कारण असे असू शकते की, भाजप शिंदे गटापैकी एकाला राज्याचा मुख्यमंत्री करेल का, असे बंडखोर आमदारांना टोमणे मारणाऱ्या उद्धव ठाकरे यांना त्यांना प्रत्युत्तर द्यायचे होते.

देवेंद्र फडणवीस यांना सत्तेचा मोह नाही हे सांगायचे होते. खरे तर राजकारण हा संदेशांचा खेळ आहे. मला सत्तेचा मोह नाही, असे उद्धव यांनी राजीनामा जाहीर करताना म्हटले होते. फडणवीस यांनीही उद्धव यांना त्याच पद्धतीने उत्तर देण्याचा प्रयत्न केला.

2019 मध्ये शिवसेनेसोबत सरकार स्थापनेसाठी बोलणी झाली नसताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह भाजप सत्तेत आले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. यानंतर भाजप सत्तेसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो, असा संदेश गेला होता. हा संदेश फुसून टाकायचा होता. 

शिवसेनेच्या 40 आमदारांनी ज्या प्रकारे बंडखोरी केली, त्यात भाजपचा हात असल्याचेही राजकीय वर्तुळात बोलले जात होते. भाजप सत्तेसाठी काहीही करु शकते, असा संदेश पुन्हा लोकांमध्ये गेला. हा संदेश दूर करण्यासाठी भाजपने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले आणि त्यांना सत्तेचा मोह नाही हे सांगण्याचा प्रयत्न केला.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *