Headlines

पुरेशा पावसाशिवाय पेरणी नको कृषीमंत्री दादाजी भुसे यांचे शेतकऱ्यांना आवाहन

 सोलापूर- पुरेसा पाऊस पडल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करु नये, असे आवाहन कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी आज केले.श्री. भुसे यांच्या अध्यक्षतेखाली आज खरीप हंगाम आढावा बैठक झाली. बैठकीस जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, विभागीय उपसंचालक दिलीप झेंडे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. बैठकीत खते, बियाणे यांची उपलब्धता,…

Read More

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे आणखी तीन महिने मोफत अन्नधान्य द्या-अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मोफत तांदूळ व डाळ वितरणास तीन महिन्यांची मुदतवाढ द्यावी मुंबई,  दि. १८ जून :- कोविड – १९ प्रादुर्भावामुळे देशात करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात केंद्र शासनाच्या पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेच्या माध्यमातून एप्रिल ते जून २०२० या तीन महिन्यांसाठी प्रती व्यक्ती ५ किलो मोफत तांदूळ व प्रतिशिधापत्रिका १ किलो डाळ मोफत…

Read More

कोणत्याही कर्जाची वसुली ३१ ऑगस्टपुर्वी करू नका जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे बँकांना निर्देश

सोलापूर, दि. १२ :  कोरोना विषाणू मुळे जनतेची आर्थिक कोंडी झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये भारतीय रिझर्व्ह बैंकेच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे शासकीय, खाजगी बँका, पतसंस्था, वित्तीय संस्था यांनी ३१ ऑगस्टपर्यंत कर्ज वसुली करू नये, असे निर्देश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिले.                जिल्ह्यात बँका, पतसंस्था, वित्तीय संस्था कर्ज वसुलीसाठी तगादा…

Read More

मालवाहू ‘एस.टी’ ची विश्वासार्ह सेवा; लालपरीचं असंही ‘संजीवन’ रुप

मालवाहू बसच्या ५४३ फेऱ्या; ३ हजार टन मालवाहतूक ९० हजार किलोमीटरचा प्रवास; २१ लाख रुपयांचे उत्पन्न मुंबई दि. १२:  महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी लोकप्रिय लालपरी ‘एस.टी.’ ने आता मालवाहतूकीच्या क्षेत्रातही नवी भरारी घेतली असून विश्वासार्हता आणि सुरक्षितता या द्विसूत्रीमुळे एस.टीने मालवाहतूक करणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. परिणामी एस.टी महामंडळालाही वाढीव उत्पन्नाच्या रुपाने नवसंजीवनी मिळत…

Read More

खरीप पीक विमा व शेतकर्‍यांच्या विविध मागण्याचे वडवणी तहसीलदारांना किसान सभेचे निवेदन

प्रतनिधी (बीड ) –  खरीप २०१९ मध्ये वडवणी  तालुक्यातील सर्व शेतकर्‍यांनी अॅग्रीकॅलचर इंशोरन्स कंपनी कडे आपल्या पीकाचा विमा काढलेला आहे व आता कापूस या पिकाचा विमा कंपनी ने हेक्टरी 4041 रू व एकरी १६४४.रू मंजूर केला आहे .आणि आता शेतकर्‍यांच्या खात्यावर  वीमा रक्कम जमा होत आहे पण हि रक्कम खूपच कमी (अत्यंल्प)आहे. कारण पीक विमा…

Read More

‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत काही निर्बंध आणखी शिथिल तर नवीन उपक्रमांना संमती

मुंबई, दि. ४ –  राज्य शासनाने ‘मिशन बिगिन अगेन’अंतर्गत अजून काही नवीन उपक्रमांना संमती दिली आहे. यासाठी ३१ मे रोजी जारी करण्यात आलेल्या शासन आदेशातील मार्गदर्शक सुचनांमध्ये काही सुधारणा करण्यात आल्या आहेत. यासंदर्भातील सुधारित शासन आदेश आज जारी करण्यात आला. तसेच याबरोबर काही उपक्रमांवर काही निर्बंधही घालण्यात आले आहेत. एमएमआर क्षेत्रातील महापालिका तसेच पुणे, सोलापूर,…

Read More

जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार,जनावरांचे बाजार बंद

सोलापूर:- कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज एक जून रोजी आठवडी बाजार बंद  करण्यासंदर्भात आदेश लागू केला आहे.सोलापूर जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार, जनावरांचा बाजार, मॉल्स आता दिनांक 30 जून 2020 च्या मध्यरात्रीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विषाणूची लागण एका संक्रमित रुग्णाकडून अन्य व्यक्तीस होऊ शकते. त्यामुळे लोकांचा समूह एकत्र जमू नये यासाठी सर्व प्रकारचे आठवडी बाजार, जनावरांचे बाजार, मॉल्स भरवण्यास आदेशान्वये मनाई करण्यात आली आहे. सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिला आहे. तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर बंदी           कोरोना या विषाणूंचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात पानपट्टी, मावा विक्री, प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ विक्री केंद्र बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जारी केले आहेत.  तंबाखूजन्य पदार्थ विक्री 30 जून 2020 रोजी मध्यरात्रीपर्यंत बंदी करण्यात आली आहे. सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी म्हटले आहे.

Read More

टोमॅटो पिकावरील नवीन तिरंगा विषाणूच्या टी.व्ही.-९ वरील दि.१५ मे, २०२० रोजीच्या बातमी बदल

महाराष्ट्र राज्यात टोमॅटो या भाजीपला पिकाची लागवड प्रामख्याने नाशिक,अहमदनगर,पुणे औरंगाबाद, नागपुर लातूर या जिल्हयात करण्यात येते.  राज्यात टोमॅटो पिकाचे सर्वसाधारण क्षेत ३३९५० हेक्टर असुन त्यापासुन ८,४८,५५० मे.टन इतके उत्पादन मिळते. अहमदनगर जिल्हयातील संगमनेर व अकोला या तालुक्यातील टोमॅटो उत्पादक शेतकरी टोमॅटोवरील नवीन तिरंगा विषाणुजन्य रोगाच्या प्रादुर्भावामुळे त्रस्त असल्याची बातमी मराठी वृत्त वाहिनी टी.व्ही -९ वर…

Read More

कोरोना प्रतिबंधासाठी डीपीसीमधून चार कोटी 15 लाख रुपये मंजूर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती

        सोलापूर दि. 14 : कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठीच्या उपाययोजनासाठी सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या जिल्हा वार्षिक योजनेतून आर्थिक वर्ष 2020-21मधून  चार कोटी 15 लाख 20 हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला असून आतापर्यंत एक कोटी 37 लाख 56 हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. गेल्या आर्थिक वर्षात 7 कोटी…

Read More

राज्यातील धरणांची मान्सूनपूर्व तपासणी करून धोकादायक धरणांना भेटी देवून आवश्यक उपाययोजनांचा अहवाल तातडीने सादर करावा मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे आदेश

मुंबई, दि.११: राज्यातील लघु पाटबंधारे योजनांची मान्सूनपूर्व तपासणी करून धोकादायक धरणांना भेटी देवून आवश्यक उपाययोजनांचा अहवाल सादर करावा अशा सूचना मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी विभागाला दिल्या. श्री गडाख म्हणाले,मृद व जलसंधारण विभागाच्या अधिपत्याखालील सर्व धरणांचा मान्सूनपूर्व तपासणी अहवाल वेळीच सादर केला जाईल याची दक्षता घ्यावी, तसेच धरण सुरक्षिततेच्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना तातडीने कराव्यात व…

Read More