नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अखेर मंगळवारी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात ई-पासपोर्टची अधिकृत घोषणा केली. पासपोर्टच्या समस्येला लोकांना सामोरे जावे लागत असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सरकारने मोठा पुढाकार घेतला आहे. आता एम्बेडेड चिप आणि फ्युचरिस्टिक तंत्रज्ञानासह ई-पासपोर्ट सुरू केले जातील. नागरिकांच्या सुविधा वाढवण्यासाठी 2022-23 मध्ये ई-पासपोर्ट जारी केला जाईल, असा प्रस्ताव अर्थसंकल्पात आहे.
- प्रेम आणि नात्याचा अनुबंध उलगडणारा ‘लेक असावी तर अशी’, ट्रेलर तुम्ही पाहिलात का?
- 32 वर्षांपासून बेपत्ता आहे ‘हा’ अभिनेता; कोण म्हणालं वेड्यांच्या इस्पितळात कोण, म्हणालं रस्त्यांवर दिसला, सत्य काय?
- ‘कभी खुशी कभी गम’मधील शाहरुख- काजोलचा ऑनस्क्रीन मुलगा आता कायच्या काय हॅण्डसम दिसू लागलाय, Photo पाहिले?
- ‘Chamkila’ चित्रपट आणि अमिताभ बच्चन यांचं काय आहे कनेक्शन?
- 2 महिन्यानंतर कोमातून बाहेर आली 25 वर्षीय Adult Star; ‘त्या’ रुममध्ये फेब्रुवारीत काय घडलं? गूढ कायम
काही दिवसांपासून ई-पासपोर्टबाबत चर्चा सुरू होती. गेल्या महिन्यातच, परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव संजय भट्टाचार्य यांनी एका ट्विटद्वारे पुष्टी केली की भारत सरकार आपल्या नागरिकांसाठी संपूर्ण नवीन पासपोर्ट प्रणाली लागू करण्यास तयार आहे.
या नवीन पासपोर्टमध्ये बायोमेट्रिक पासपोर्ट चिप सक्षम असेल. या पासपोर्टवर लोकांना बायोमेट्रिक डेटा टाकावा लागेल. नवीन ई-पासपोर्ट्समुळे प्रवाशांना जगभरातील इमिग्रेशन पोस्टद्वारे सहज हस्तांतरण करण्यात मदत होईल. हा पासपोर्ट कोणत्याही प्रकारची बनावटगिरी रोखण्यास सक्षम असेल. पासपोर्टमधील चिपमध्ये कोणी छेडछाड करण्याचा प्रयत्न केल्यास, यंत्रणा त्याचा शोध घेईल. एकदा आढळल्यानंतर, विमानतळावर पासपोर्ट पडताळणी अयशस्वी हो
ई-पासपोर्टचे फायदे
- बायोमेट्रिक डेटासह ई-पासपोर्ट सुरक्षित केला जाईल.
- पासपोर्टच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही हे पूर्वीपेक्षा चांगले असेल.
- ई-पासपोर्ट आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेच्या (IACO) मानकांनुसार असेल.
- ई-पासपोर्टवरील चिप रेडिओ-फ्रिक्वेंसी आयडेंटिफिकेशन (RFID) द्वारे अनधिकृत डेटा प्रतिबंधित करेल.
- ई-पासपोर्ट ओळख चोरी आणि बनावटगिरी रोखण्यासाठी देखील मदत करेल.
- आत्तापर्यंत भारतीय नागरिकांना छापील बुकलेट पासपोर्ट जारी केले जात आहेत.