Headlines

बार्शी- तालुका कृषि अधिकारी शहाजी कदम यांचे शेतकर्‍यांना जाहीर आवाहन

संग्रहित छायाचित्र

खरीप हंगाम २०२२ साठी सोयाबीन पेरणी करतांना घ्यावयाच्या दक्षतेबाबत  कृषी विभागानेही शेतकऱ्यांना  जाहीर आवाहन केले आहे.

  • पेरणीसाठी स्वतःकडे उपलब्ध असलेले चांगले बियाणे पेरणीसाठी वापरा.
  • रणीपूर्व बीजप्रक्रीया करावी.
  • चांगली ओल म्हणजे ७५ ते १०० मि. मि. पाऊस झाल्यानंतरच सोयाबीनची पेरणी करावी.
  • ३ ते ४ सेंटीमीटर खोलीपर्यंत पेरणी करावी,७५ ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच सोयाबीनची पेरणी करावी.
  • प्रति हेक्टरी बियाणे दर ७५ किलोवरून ५० ते ५५ किलोवर आणण्यासाठी टोकण पद्धतीने किंवा बी. बी. एफ. पद्धतीचा वापर करून पेरणी करावी.
  •  सोयाबीनची उगवणक्षमता ७० टक्क्यांपेक्षा कमी असल्यास उगवण क्षमतेच्या प्रमाणात अधिकचे बियाणे पेरणीसाठी वापरण्यात याव.
  •  पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास ३ ग्रॅम थायरमची बुरशीजन्य रोगांपासून संरक्षणासाठी बीजप्रक्रिया करावी.
  •  रायझोबियम व पीएसबी जिवाणू संवर्धकाची प्रत्येकी २०० ते २५० ग्रॅम प्रति १० ते १५ किलो बियाण्यास पेरणीपूर्वी तीन तास अगोदर बीजप्रक्रिया करून बियाणे सावलीत वाळवावे व नंतर त्याची पेरणी करावी.
  •  बियाण्याची पेरणी ३ ते ४ सेंटीमीटर खोलीपर्यंत करावे.

असे आवाहन बार्शी तालुका कृषी अधिकारी शहाजी कदम यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *