बाळासाठी प्रयत्न करुनही पदरी अपयश, अखेर अभिनेत्री अडकतेय लग्न बंधनात

[ad_1]

मुंबई : प्रत्येकाच्या आयुष्यात चढ-उतार येत असतात. पण आपल्या कठीण काळात आपल्यासोबत कायम राहणारे मात्र फार कमी असतात. पण काही व्यक्ती अशा असतात, ज्या कधीचं साथ सोडत नाहीत. आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबात एक अशी व्यक्ती असतेचं. जी आपल्याला आयुष्याच्या प्रत्येक वळणावर साथ देते. अभिनेत्री पायल रोहतहीच्या आयुष्यात देखील अशी एक व्यक्ती आहे. ज्या व्यक्तीसोबत अभिनेत्री विवाह बंधनात अडकणार आहे. 

पायल बॉयफ्रेंड संग्राम सिंगसोबत लग्नगाठ बांधणार आहे. त्यांनी बुधवारी त्यांच्या घरी मेहंदी सोहळा आयोजित केला होता, ज्याचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पायल आणि संग्राम 9 जुलै रोजी आग्रा येथे विवाह बंधनात अडकणार आहेत. 

कठीण परिस्थितीत संग्रामने सोडली नाही पायलची साथ
पायल आणि संग्राम सिंह गेली 12 वर्षे रिलेशनशिपमध्ये आहेत. गरोदर राहिल्यानंतर लग्न करणार असल्याचा निर्णय तिनं आधीच घेतला, त्यासाठी प्रयत्नही सुरु केले. पण, तसं काहीच होत नसल्यामुळं आपलं लग्नही लांबत असल्याचं पायल म्हणाली. 

आपल्या मनातल्या भावना बोलून दाखवत असताना Lock Upp या शोमध्ये पायलच्या भावनांचा बांध फुटला. संग्रामला तिनं आपल्या का कमतरतेमुळं दुसऱ्या मुलीशी लग्न करण्याचाही सल्ला दिला. 

संग्रामला जी मुलगी मूल देऊ शकेल तिच्याशी त्यानं लग्न करावं अशी इच्छा तिनं व्यक्त केली होती. पण, संग्रामनं तिची साथ आजवर सोडलेली नाही. येत्या दिवसांत आपण सरोगसीचा मार्ग अवलंबणार असल्याचंही ती यावेळी म्हणाली. 

सध्याची पिढी ही त्यांचं भवितव्य घडवण्यासाठी झटत असते. पण, असं करत असताना ही पिढी त्यांच्या खासगी आयुष्याला दुय्यम स्थान देते. ज्याचे परिणाम अतिशय गंभीर स्वरुपाचे असतात, असं म्हणत पायलनं स्वत:च्या अनुभवातून इतरांनी शिकवण घ्यावी, असा संदेशही दिला. 

 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *