Headlines

चिकुंद्रा गावातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण

प्रतिनिधी / पुरूषोत्तम बेले – तुळजापूर तालुक्यातील चिकुंद्रा गावात कोरोणा चा धोका अधिक होत जात आहे. पुणे, मुंबई, या शहरातुन येणारे लोक शासनाच्या नियमाप्रमाणे १५ दिवस कॉरंन्टाईन न होता, राजरोसपणे गावात फिरत चौकात गप्पा मारत फिरताना दिसत आहेत. संदर्भित बाब गावातील तरुणांनी ग्रामपंचायत कार्यालय व कर्मचारी ग्रामसेवक यांच्या निदर्शनास आणून दिली असली तरीही अद्याप या पुणे मुंबई कर यांच्या वर कारवाई करण्यास संबंधित विभाग अकार्यक्षम दिसत आहे. त्यामुळे गावात परिस्थिती गंभीर होण्याची चिन्हे दिसून येत आहे, यावर प्रशासनाने तात्काळ कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *