Headlines

खरीप पीक विमा व शेतकर्‍यांच्या विविध मागण्याचे वडवणी तहसीलदारांना किसान सभेचे निवेदन

प्रतनिधी (बीड ) –  खरीप २०१९ मध्ये वडवणी  तालुक्यातील सर्व शेतकर्‍यांनी अॅग्रीकॅलचर इंशोरन्स कंपनी कडे आपल्या पीकाचा विमा काढलेला आहे व आता कापूस या पिकाचा विमा कंपनी ने हेक्टरी 4041 रू व एकरी १६४४.रू मंजूर केला आहे .आणि आता शेतकर्‍यांच्या खात्यावर  वीमा रक्कम जमा होत आहे पण हि रक्कम खूपच कमी (अत्यंल्प)आहे. कारण पीक विमा भरणा प्रीमियर हा एकरी ८६० रू आहे. व हेक्टरी २०२१ रू आहे. म्हणजे जेवढा प्रीमियर भरला आहे त्याच्या एकपट सुद्धा पीक विमा रक्कम हि कंपनी ने दिलेली  नाही  . एकरी, प्रीमीयर(विमाभरणा रक्कम) + CSC +7/12 +झेरॉक्स  =, ८६०+१००+३०+२० =१००० रू एक हजार रूपये हा एकरी कापसाचा विमा भरण खर्च आहे , आणि  मंजुर विमा रक्कम १६४४ रू म्हणजे फक्त  ६०० रू शेतकर्‍यांला नुकसान भरपाई रक्कम कंपनी ने दिलेली आहेत व कंपनीने शेतकर्‍यांची सरळ  फसवणूक केली आहे.

     खरीप हंगामातील कापूस, तुर व सोयाबीन पीकाच १००% नुकसान झाले  असल्याकारणाने शेतकर्‍यांनी पीक लागवडी साठी केलेला खर्च सुद्धा निघाला नाही. या खरीप हंगामात तालुक्यातील व कवडगाव महसूल मंडळातील शेतकर्‍यांनी २२ ते २४ जून रोजी लागवड ( लावणी )केली.लागवड केल्यापासून ५० दिवस पाऊस न पडल्यामुळे पीक पाण्या अभावी करपून गेले व शेतकर्‍यांना दुबार पेरणी करावी लागली.असे  तालुका कृषीअधिकारी यांनी दिलेल्या अहवालात म्हटले आहे.
                    जे पीक पाऊस न पडता ही तग  धरूण होती .ती सप्टेंबर व अॉक्टोबर महिन्यात पडलेल्या अवकाळी व परतीच्या पाऊसाने सगळी पीके उद्ध्वस्त झाली. पीक पाण्याखाली गेली  व नदीच्या काठावरील शेतात ४ ते ८  दिवसाऊन अधिककाळ पाणी राहिल्यामुळे पीक पिवळे पडुन जळून  मृत झाले.या मृत (नुकसान) झालेल्या पिकाचे  पंचनामे महसूल  प्रशासनाने केले. पिकाचे  नुकसान झाल अस पंचनाम्यात नमूद केलेले आहे. कवडगाव मंडळाची आणेवारी सुद्धा कमी आहे .  उत्पादन व उत्पन्न काहीच निघाल नाही .म्हणून शेतकरी हवालदिल झालेला आहे.

      शेतकर्‍यांना आता तारण्यासाठी मदतीसाठी त्यांनी काढलेले पिकाचे विमे (विमा) हाचा अशेचा किरण होता म्हणून शेतकर्‍यांनी कंपनी व प्रशासन सांगेल त्या प्रमाणे कागदपत्र सरकारी कार्यालयामध्ये जमा केले.  यामध्ये “पीकचे नुकसान” झाले आहे असा अर्ज कंपनीला देण्यासाठी  शेतकरी भर पाऊसात उभे ठाकले.नंतर “पीक नुकसान भरपाई “मिळावी चा अर्ज तालूका कृषी अधिकारी व कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिला .असे दोन अर्ज त्या सोबत 7/12 आठ,  विमा भरलेली पावती, अधारकार्ड ,बँक पासबुक ची झेरॉक्स, पीक नुकसान झालेले अँगल कॅमेरे चे फोटो हे शेतकर्‍यांनी अर्जा सोबत जोडुन दिले . तालुका कृषी अधिकारी व कंपनी कर्मचारी, महसूल प्रशासनाने केलेल्या पंचनाम्यात पिकाचे नुकसान झालेले आहे.  कंपनीने संवेदनशीलपने विचार करून शेतकर्‍यांना कापूस व अन्य   पीकांचा विमा हेक्टरी ३०,००० रू मंजूर करावा. अन्यथा शेतकरी व किसान सभा कंपनी व प्रशासनाच्या विराधात संवैधानिक मार्गाने तीव्र आंदोलन करतील .असा इशारा किसान सभेच्या वतीने देण्यात आला.
 खरीप  २०१९ मधील  कापूस, तुर, पिकाचा विमा हेक्टरी ३०,००० रू देण्यात यावा  .२०२० मधील खरीपाचा विमा भरणा सुरू करावा. शेतकर्‍यांना लागवडी साठी खते व बियाणे चा मुबलक व रास्त भावात  पुरवठा करावा.कापूसची  नोंद सुरू ठेवावी व CCI ने कापूस खरेदी करावा. टोमॅटो पिकांवर पडलेल्या रोगामुळे टॉमॅटो उत्पादक  शेतकर्‍यांना शासनाने मदत करावी.नैसर्गिक आपत्तीमधे शेतकर्‍यांना खऱ्या अर्थाने संरक्षण मिळेल अशी पीक विमा योजना सुरू करा .शेतीचा विद्युत पुरवठा व्यवस्थित करावा.  महात्मा फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजनेच्या ३ र्‍या , ४ थ्या यादीच आधार प्रमाणीकरण सुरू करण्यात  याव . शेतकर्‍यांना सौरकृषी पंपाचे  लवकरात लवकर वाटप करावे  व नवीन सौरकृषी पंपाना मान्यता द्यावी. नवीन सौरकृषी पंपासाठी अर्ज स्वीकारावेत .जे नियमीत कर्ज भरणारे शेतकरी आहेत त्यांना प्रोत्साहनपर अनुदान द्यावे.अशा मागण्या तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात केल्या आहेत.निवेदन  किसान सभेचे नेते ओम पुरी ,गणेश अंबुरे, प्रकाशअंबुरे, लहु खारगे ,सत्यजीत मस्के, आमोल बडे इत्यादीनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *