उस्मानाबाद:- असंख्य अडचणींवर मात करून बळीराजाने यावर्षी खरीप हंगामातील पिके घेतली आहेत. हाती आलेल्या पिकाला योग्य भाव मिळावा म्हणून शेतकरी अपेक्षेने पाहत आहेत. बाजारात वेगवेगळ्या पिकांची आवकही सुरू झाली आहे; पण बाजार भाव हमी भावापेक्षा कमी असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून केंद्र शासनाने किमान आधारभूत किमती जाहीर केल्या आहेत, तरीही काही ठिकाणी खरेदी केंद्रावर वेगवेगळी कारणे सांगून कमी भावात शेतकऱ्यांचा माल खरेदी केला जात आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या किमान आधारभूत किंमतीपेक्षा कमी दराने खरेदी करणे हा पणन कायदा कलम 34 आणि 94 ड नुसार गुन्हा आहे. पिके व किमान आधारभूत किमती प्रति क्विंटल/ रुपयाप्रमाणे भात/धान 1868, भात/धान(ए ग्रेड) 1888, ज्वारी 2620, ज्वारी मालदांडी 2640, बाजरी 2150, नाचणी 3295, मका 1850, तूर 6000, मूग 7196, उडीद 6000, भुईमूग 5275, सुर्यफुल 5885, सोयाबीन 3880, तीळ 6855, कारळे 6695, कपाशी मध्यम धागा 5515, कपाशी लांब धागा 5825, उस 2850 (प्रति टन) आहे.
खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना कोणतीही अडचण आल्यास तात्काळ शिवार हेल्पलाइनला ८९५५७७१११५ संपर्क साधावा असे आवाहन शिवार फाऊंडेशन चे प्रमुख विनायक हेगाणा यांच्याकडून करण्यात आले आहे. हेल्पलाइन सकाळी १० ते रात्री ६ पर्यंत मोफत आहे.