प्रतिनिधी / आसिफ मुलाणी- कारी येथे जेष्ठ नागरिक, निराधार, अपंग नागरिकांना दररोज सकाळी व संध्याकाळी या संस्थेच्या माध्यमातून अन्नदान करण्यात येणार आहे याचा प्रारंभ आजपासून करण्यात आली
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे चंद्रकांत उळेकर, सामाजिक कार्यकर्ते राहुल भड, कारी गावच्या पोलिस पाटील अमृता माळी उपस्थित होते.
यावेळी चंद्रकांत उळेकर, राहुल भड, अमृता माळी आदींनी मनोगत व्यक्त केले.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेच्या कार्यकर्त्या शारदा गायकवाड, सरस्वती चौधरी, मनीषा गायकवाड, सुवर्णा पंढरे यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुवर्णा पंढरे तर प्रस्थाविक संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब वडवे यांनी केले