Headlines

मोफत तांदूळ आणि चणा डाळ योजनेला नोव्हेंबर पर्यत मुदतवाढ- पंतप्रधानांच्या घोषणेचे मुख्यमंत्र्यांनी केले स्वागत

प्रतिनिधी- प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेची मुदत नोव्हेंबरपर्यंत वाढविण्याची घोषणा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. त्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वागत केले आहे.

मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वीच एका व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये याविषयी पंतप्रधानांना योजनेस मुदतवाढ देण्याची विनंती केली होती.

या योजनेत तांदूळ आणि चणा डाळ देण्यात येत असून राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील सुमारे 7 कोटी लोकांना याचा लाभ होणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *