Headlines

तीन काळे कृषी कायदे रद्द करण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेने पाळला काळा दिवस

बार्शी /प्रतिनिधी -अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने केंद्र सरकारने संमत केलेले तीन कृषी कायदे रद्द करावेत ही मुख्य मागणी घेऊन निषेध व्यक्त करत काळा दिवस पाळून मा. तहसीलदार यांना निवेदन दिले. हे निवेदन 26 मे 2021 रोजी कॉम्रेड तानाजी ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाने देण्यात आले.

यामध्ये तीन कृषी कायदे रद्द करा, कामगार विरोधी चार लेबरकोड मागे घ्या, रेशन, बेरोजगार भत्ता, व कोरोनाची लस तातडीने द्या या मागण्या देखील मा. पंतप्रधान यांना करण्यात आल्या आहेत.

यावेळी कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालया समोर काळे फुगे हवेमध्ये सोडून निषेध नोंदवला. यावेळी कॉम्रेड प्रवीण मस्तूद, कॉम्रेड अनिरुद्ध नखाते, कॉम्रेड धनाजी पवार, कॉम्रेड भारत भोसले, कॉम्रेड बालाजी शितोळे, कॉम्रेड पवन आहिरे हे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *