तुळजापूर/अक्षय वायकर – तुळजापूर तालुक्यातील कात्री रोड, अपसिंगा येथील ऋषिकेश पाटील यांचे अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होवून जनावरे वाहून गेली आहेत.खासदार ओमराजे निंबाळकर यांनी प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधत धीर दिला.तसेच जिल्हा प्रशासनाला नुकसान झालेल्या सर्व क्षेत्राचे सरसकट पंचनामे करण्याचे शेतकऱ्यांना शासनाकडून व विमा कंपनीकडून योग्य ती नुकसान भरपाई वेळेतच कशी मिळेल या बाबत दक्षता घेण्याचे निर्देश खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी दिले. यावेळी तहसीलदार सौदागर तांदळे, शेतकरी, गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
शेतऱ्यांसाठी मदत केली पाहिजे…