अहमदनगर /निखिल भाटे – महाराष्ट्रातील बहूजनांचा कणखर बाणा पहाडी वक्तृत्वाचा बुलंद आवाज, सामाजिक समता मंचाचे राज्य संस्थापक कार्याध्यक्ष मार्क्स फूले आंबेडकर यांच्या विचारांचा कृतिशील वारसा जनसामान्यांच्या मनात उतरवणारे राहता तालुक्यातील आयु विनायकराव (भाऊ ) मारोतराव निकाळे यांचे वयाच्या 71 व्या वर्षात आज अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुळे एक मुलगी, नातवंडे, भाऊ असा मोठा परिवार आहे. विनायकरावांच्या जाण्याने चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे. त्याच्यावर राहता येथील स्म्शानभूमीत आज दुपारी 12:30 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.